शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

क्लिअरन्स हाऊसअभावी बँक खातेदारांना तिसऱ्या दिवशी मिळतात पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 01:02 IST

शहरासह तालुक्यात विविध प्रकारच्या २२ बँकांच्या शाखा आहेत. १९ विविध प्रकारच्या बँक चोपडा शहरात आहेत. मात्र क्लिअरन्स हाऊसअभावी बँक खातेदारांना तिसºया दिवशी पैसे मिळतात.

ठळक मुद्देचोपडा तालुक्यातील खातेदारांचे हालक्लिअरन्स हाऊस चोपड्यात असणे गरजेचे

संजय सोनवणेचोपडा, जि.जळगाव : शहरासह तालुक्यात विविध प्रकारच्या २२ बँकांच्या शाखा आहेत. १९ विविध प्रकारच्या बँकचोपडा शहरात आहेत. मात्र क्लिअरन्स हाऊसअभावी बँक खातेदारांना तिसºया दिवशी पैसे मिळतात. यामुळे तालुक्यातील खातेदारांचे हाल होत असल्याचे चित्र आहे.चोपडा शहरासह तालुक्यातील या सर्व बँकांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून तालुक्यात आर्थिक व्यवहार आणि उलाढाल बघता येथे शाखा स्थापन केल्या आहेत. मात्र खातेदारांना धनादेशाद्वारे जर पैसे दुसºया बँकेतून आपल्या खाती वर्ग करायची असतील तर त्यासाठी येथील स्टेट बँकेत अथवा एचडीएफसी बँकेत धनादेश क्लिअरन्स हाऊस असणे अत्यावश्यक आहे. असे असताना हे हाऊस येथे स्टेट बॅँकेच्या शाखाही सुरू करीत नाही आणि एचडीएफसी बँकेला ही असे केंद्र सुरू करण्यासाठी ना हरकत स्टेट बँकेकडून दिली जात आहे म्हणून धनादेश वटायला तिसरा दिवस उजाडतो. त्यामुळे बँक खातेदाराला त्याचे पैसे असल्यावरही ताटकळत थांबावे लागते. धनादेश जमा केल्यानंतर तिसºया दिवशी ते पैसे उपयोगात येतात आणि क्लिअरन्स हाऊस असले तर विशिष्ट वेळात सर्व बँकांचे प्रतिनिधी एकाच ठिकाणी येतील व तिथल्या तिथे प्रत्येक बँकेला आज देणे किती व घेणे किती हे समजणार आहे आणि त्यावर प्रत्येक बँकेला आपल्या तिजोरीत किती पैसे असणार किंवा किती पैसे कमी पडतात हे समजू शकेल. पुढील व्यवहाराला ते सोयीस्कर होणार आहे. म्हणून धनादेश क्लिअरन्स हाऊस येथे स्थापन होणे गरजेचे आहे. स्टेट बँक सोडून इतर दुसºया म्हणजे केवळ एचडीएफसी बँकेतही हे हाऊस स्थापन करता येते मात्र त्यासाठी येथील स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकांचे त्याबाबत एनओसी (हरकत नसल्याचे पत्र) लागते. अर्थात हे सर्व अधिकार रिझर्व्ह बँकेला आहेत, असेही समजले आहे. मात्र सर्वात अग्रेसर बँक म्हणून एसबीआय बँकेला हे हाऊस असते. एसबीआयच्या विभागीय कार्यालयाने केंद्र सुरू करायचे की नाही ठरवायचे असते. येथील एचडीएफसी बँकेतील शाखा व्यवस्थापकांनी स्टेट बँकेच्या व्यवस्थापनाकडे एनओसी मिळावी यासाठी लेखी मागणी केली असल्याचे समजले आहे. मात्र त्यांना एनओसी पत्र किंवा आम्ही सुरू करतो, असे काहीच दिले जात नसल्याचे समजले आहे.शहरात सहकारी, नॉन शेड्यूल्ड, शेड्यूल्ड आणि राष्ट्रीयकृत अशा एकूण विविध प्रकारच्या १९ बँकांनी चोपड्यात पदार्पण केले आहे. त्यात स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, देना बँक, सेंट्रल बँक, जिल्हा बँक, धरणगाव अर्बन बँक, जळगाव पीपल बँक शाखा, चोपडा पीपल बँक, क्सिस बँक, शिरपूर पीपल बँक, आयसीआयसीआय बँक, बँक आॅफ महाराष्ट्र, हिंगोली पीपल बँक यासह इतर बँकेच्या शाखा सुरू झाल्या आहेत.आरबीआयची परवानगी लागते. आरबीआयच्या निर्देशानुसार दोनच बँक हे हाऊस सुरू करू शकतात. एक म्हणजे एसबीआय बँक आणि दुसरी बँक एचडीएफसी बँक. मात्र एचडीएफसीला स्टेट बँकेने एनओसी न दिल्याने सध्या प्रत्येक बँकेच्या काऊंटरवरच ही प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक बँकेला यासाठी एक व्यक्ती शहरातील व तालुक्यातील सर्व बँकांमध्ये धनादेश क्लिअरन्ससाठी पाठवावे लागते.सर्वसाधारणपणे सरासरी एका दिवसात एका बँकेत नोटबंदी आधी केवळ १५ ते २० धनादेश येत होते. नोटबंदीनंतर मात्र धनादेशाद्वारे व्यवहार करणाºया खातेदारांची संख्या एका दिवसाला सरासरी ६० ते ७० च्या वर गेली आहे. एवढी संख्या सर्वच बँकेत असते म्हणून सर्व बँक खातेदारांना जर त्याच दिवशी पैसे वापरता यावेत असे बँकांना वाटत असेल तर क्लिअरन्स हाऊस चोपड्यात असणे गरजेचे आहे. अन्यथा खातेदारांच्या ठेवींवर चालणाºया बँका खातेदारांचे हित कितपत जोपासतात अशी शंका निर्माण होऊ शकते.आता क्लिअरन्स हाऊस ही संकल्पना जुनी झाली आहे. त्याही पुढील प्रक्रिया म्हणजे धनादेश क्लिअर होण्यासाठी देशभर चार केंद्र सुरू होणार आहेत. धनादेश स्कॅन करून मुंबई येथे पाठविला जाईल आणि त्याच क्षणी संबंधित व्यक्तींच्या खात्यात पैसे जमा होतील.-रामेश्वर कदम, शाखा व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक, चोपडा

टॅग्स :bankबँकChopdaचोपडा