शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
5
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
6
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
7
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
8
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
11
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
12
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
13
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
14
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
15
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
16
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
17
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
18
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
19
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
20
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू

आशा कर्मचाऱ्यांचा सरकारला ४८ तासांचा अल्टीमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 22:42 IST

राज्य शासनाने ४८ तासांत मागण्या मान्य न केल्यास लढा तीव्र करण्याचा इशारा आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी दिला आहे.

ठळक मुद्देमागण्या मान्य न झाल्यास लढा तीव्र करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

चोपडा : राज्य शासनाने ४८ तासांत मागण्या मान्य न केल्यास लढा तीव्र करण्याचा इशारा आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी दिला आहे. त्यांनी आरोग्य अधिकारी डॉ. महेश निळे यांचे कार्यालयीन अधीक्षक एस. टी. पाटील व प्रदीप पाटील यांना निवेदन दिले.

येत्या ४८ तासांत महाराष्ट्र शासनाने आशा यांच्या मागण्या मंजूर न केल्यास लासूर पी. एच. सी. मधील ३२ आशा व २ गटप्रवर्तक बेमुदत कामावर बहिष्कार टाकतील. इतर अनेक आरोग्य केंद्रांतील आशा गटप्रवर्तकही संपाची तयारी करीत आहे, अशी माहिती जळगाव जिल्हा आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील आशांनी १५ जून रोजी लाक्षणिक संप करून सरकारला १४ मागण्यांचे निवेदन दिले होते. त्याचा पाठपुरावा केला. त्या निवेदनावर महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य खात्याने काही विचार न केल्यामुळे सरकारने आशांनी कामांवर बेमुदत बहिष्कार आंदोलन लादले आहे. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक रविवारसहित दररोज आठ तासांपेक्षा जास्त काम करतात. म्हणून त्यांना इतर आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे, आशांना किमान १८ हजार रुपये तर गट प्रवर्तक यांना २१ हजार रुपये पगार द्यावा, या प्रमुख मागण्यांसह नागरी भागातील आशांना प्रोत्साहन भत्ता. शहरी व ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका यांना कबूल केल्याप्रमाणे प्रत्येकी १ हजार रुपये, गटप्रवर्तक पाचशे रुपयांप्रमाणे प्रोत्साहन भत्ता दिलेला नाही. समान कामाला समान वेतन तत्त्व लागू करावे, या मागण्यांचा समावेश आहे.

१७ जुलै २०२०च्या परिपत्रकानुसार आशा स्वयंसेविका यांना दोन हजार रुपये तर गटप्रवर्तक यांना तीन हजार रुपये कायम असून दरमहा व निश्चित स्वरूपाची असल्यामुळे रक्कम पूर्ण द्यावी, कपात करू नये, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’अंतर्गत कर्मचाऱ्यांचा थकीत मोबदला विनाविलंब द्यावा. कोरोनाबाधित आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक त्यांचे कुटुंबीयांसाठी मोफत उपचार व व्हेंटिलेटर असलेले बेड आरक्षित करा, कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचे विमा कवच द्यावे, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.

हे निवेदन युनियनचे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन यांचे नेतृत्वातील वनिता मोरे, नगूबाई चांभार, वैशाली कोळी, अंजना माळी, भारती माळी, विजया महाजन, सुनंदा पाटील, जयश्री पाटील, प्रतिभा माळी, शालिनी पाटील या प्रतिनिधींनी सादर केले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडाHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याStrikeसंप