शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

बिलं वाटप झालेल्या गाळेधारकांना भरावीच लागेल थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 01:14 IST

‘लोकमत’भेटी दरम्यान मनपा आयुक्तांची माहिती

जळगाव : मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना मार्च २०१९ पर्यंत थकीत भाडे भरण्यासाठी देण्यात आलेल्या बिलांची रक्कम मनपाकडे भरावीच लागणार आहे. बिलांच्या रक्कमेत कोणतीही घट करणे शक्यच नसून गाळेधारकांना थकीत रक्कम भरण्याशिवाय पर्याय नसल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील ‘लोकमत’ च्या शहर कार्यालयात सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांनी मनपासमोर असलेल्या अडचणी व त्या अडचणी सोडविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. आपल्या कार्यकाळात मनपातील सर्व रिक्त असलेल्या शासकीय पदांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करून, मनपात चांगल्या अधिकाºयांची टीम तयार करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती या भेटीप्रसंगी देत शहर विकासवर आपला भर राहणार असल्याची ग्वाही दिलीआर्थिक समस्या हेच मनपासमोर आव्हानमनपाची सूत्रे सांभाळण्याआधी या ठिकाणच्या आर्थिक समस्येविषयीची माहिती असल्याने कुठलेही व्हिजन घेवून आपण मनपाची सूत्रे हाती घेतली नसल्याची माहिती आयुक्त टेकाळे यांनी दिली. मनपाची आर्थिक परिस्थती बेताची असल्यानेच सर्व समस्या निर्माण झाल्या असल्याचे आयुक्तांनी सांगितले.ही समस्या दूर करण्यासाठी मनपाकडे एकमेव पर्याय मुूदत संपलेल्या मार्केटमधील गाळेच असून, आपल्या कार्यकाळात हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.मलनिस्सारण योजनेचे निविदांचे काम अंतिम टप्प्यातअमृत अंतर्र्गत मंजूर झालेल्या मलनिस्सारण योजनेच्या निविदेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, आचारसंहिता संपल्यानंतर निविदा उघडल्या जाणार असून, लवकरच कार्यादेश देवून हे काम सुरु करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.अमृतचे काम नोव्हेंबरअखेरतसेच १०० कोटीतील ५० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली असून, या कामांच्या निविदा काढून कामे दोन-तीन महिन्याचा काळात सुरु होणार आहेत.याशिवाय अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम देखील नोव्हेंबर महिन्यात पूर्णहोणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. टेकाळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.नवीन पंप बसविल्यामुळे अनेक भागांमधील पाण्याची समस्या मार्गी लागेलशहरातील अनेक उंच भागात पाणी पोहचत नसल्याचा अनेक तक्रारी मनपाकडे प्राप्त होत आहेत. वाघूर पंपीगजवळ असलेले दोन पंप हे जुने झाल्यामुळे धरणातून पाण्याची उचल चांगल्या पध्दतीने होत नव्हती. त्यामुळे अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. मात्र, बुधवारीच वाघूर पंपीग स्टेशनवर दोन नवे पंप बसविल्यामुळे पाण्याची उचल ही ९० ते ९५ टक्के होणार असल्याने ज्या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. त्या भागात देखील जास्त दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने पाणी पुरवठ्याची समस्या मार्गी लागणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव