शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
4
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
5
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
6
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
7
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोड्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
8
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
9
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
10
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
11
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
12
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
13
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
15
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
16
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
17
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
18
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
19
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
20
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
Daily Top 2Weekly Top 5

बिलं वाटप झालेल्या गाळेधारकांना भरावीच लागेल थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 01:14 IST

‘लोकमत’भेटी दरम्यान मनपा आयुक्तांची माहिती

जळगाव : मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना मार्च २०१९ पर्यंत थकीत भाडे भरण्यासाठी देण्यात आलेल्या बिलांची रक्कम मनपाकडे भरावीच लागणार आहे. बिलांच्या रक्कमेत कोणतीही घट करणे शक्यच नसून गाळेधारकांना थकीत रक्कम भरण्याशिवाय पर्याय नसल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील ‘लोकमत’ च्या शहर कार्यालयात सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांनी मनपासमोर असलेल्या अडचणी व त्या अडचणी सोडविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. आपल्या कार्यकाळात मनपातील सर्व रिक्त असलेल्या शासकीय पदांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करून, मनपात चांगल्या अधिकाºयांची टीम तयार करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती या भेटीप्रसंगी देत शहर विकासवर आपला भर राहणार असल्याची ग्वाही दिलीआर्थिक समस्या हेच मनपासमोर आव्हानमनपाची सूत्रे सांभाळण्याआधी या ठिकाणच्या आर्थिक समस्येविषयीची माहिती असल्याने कुठलेही व्हिजन घेवून आपण मनपाची सूत्रे हाती घेतली नसल्याची माहिती आयुक्त टेकाळे यांनी दिली. मनपाची आर्थिक परिस्थती बेताची असल्यानेच सर्व समस्या निर्माण झाल्या असल्याचे आयुक्तांनी सांगितले.ही समस्या दूर करण्यासाठी मनपाकडे एकमेव पर्याय मुूदत संपलेल्या मार्केटमधील गाळेच असून, आपल्या कार्यकाळात हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.मलनिस्सारण योजनेचे निविदांचे काम अंतिम टप्प्यातअमृत अंतर्र्गत मंजूर झालेल्या मलनिस्सारण योजनेच्या निविदेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, आचारसंहिता संपल्यानंतर निविदा उघडल्या जाणार असून, लवकरच कार्यादेश देवून हे काम सुरु करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.अमृतचे काम नोव्हेंबरअखेरतसेच १०० कोटीतील ५० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली असून, या कामांच्या निविदा काढून कामे दोन-तीन महिन्याचा काळात सुरु होणार आहेत.याशिवाय अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम देखील नोव्हेंबर महिन्यात पूर्णहोणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. टेकाळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.नवीन पंप बसविल्यामुळे अनेक भागांमधील पाण्याची समस्या मार्गी लागेलशहरातील अनेक उंच भागात पाणी पोहचत नसल्याचा अनेक तक्रारी मनपाकडे प्राप्त होत आहेत. वाघूर पंपीगजवळ असलेले दोन पंप हे जुने झाल्यामुळे धरणातून पाण्याची उचल चांगल्या पध्दतीने होत नव्हती. त्यामुळे अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. मात्र, बुधवारीच वाघूर पंपीग स्टेशनवर दोन नवे पंप बसविल्यामुळे पाण्याची उचल ही ९० ते ९५ टक्के होणार असल्याने ज्या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. त्या भागात देखील जास्त दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने पाणी पुरवठ्याची समस्या मार्गी लागणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव