शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पाटणादेवी जंगलात प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:57 AM

साडे सहा हजार हेक्टर परिसर: १६ पाणवठे, प्राणी, पक्ष्यांचा अधिवास

चाळीसगाव: पाटणादेवी जंगल परिसरात वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन निर्माण करण्यात आलेले १६ कृत्रिम पाणवठे खासगी टँन्करव्दारे भरण्यात येत आहे. जंगल परिसरात अन्नसाखळी सोबतच पाण्याची उपलब्धता असावी. यासाठी हे पाणवठे तयार केले असून, यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे मार्चच्या दुस-याच पंधरवाड्यात ते कोरडे पडले. यामुळेच खासगी टँन्करने ते भरले जात असल्याची माहिती वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी एम.डी,चव्हाण यांनी 'लोकमत'शी बोलतांना दिली.चाळीसगाव शहारापासून दक्षिणेला अवघ्या १८ किमी अंतरावर हिरवाईने नटलेला पाटणादेवी परिसर असून लगत असणा-या गौताळा अभयारण्यामुळे येथे जंगली श्वापदांसह प्राणी व पक्ष्यांचा अधिवास मोठ्या संख्येने आहे.प्राणी गणनेत जंगल परिसरात पाचहून अधिक बिबटे असल्याच्या नोंदी आहेत. अनेकविध दूर्मिळ पक्षी व मोठ्या संख्येने रानडुक्कर आणि माकडांच्या टोळ्या जंगलात आहे. परिसरात इतरत्र अभावाने आढळणा-या जंगली वनस्पतीही आहेत. यंदा पर्जन्यमान सरासरी गाठू न शकल्याने जंगलातील नैसार्गिक पाणवठ्यांनी तळ गाठला आहे.पाण्याचे दूर्भिक्ष्य लक्षात घेऊन साडे सहा हजार हेक्टर जंगल परिसरात गेल्या काही वषार्पूर्वी १६ कृत्रिम पाणवठे वनविभागाने तयार केले आहे. दरवर्षी एप्रिल किंवा मे नंतर ते भरले जात. यावर्षी मात्र प्राण्यांना पाणी उपलब्ध व्हावे. म्हणून मार्च मध्येच त्यात पाणी साठवले जात आहे.

टॅग्स :forestजंगल