शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
4
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
5
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
6
"पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
7
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
8
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
9
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
10
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
11
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
12
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
13
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
14
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
15
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
16
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
17
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
18
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
19
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
20
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जीवाची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अन् चाळीसगावी गरजला ‘म. गांधी की जय’चा गजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 17:35 IST

म.गांधीजी की जय! अशा गगनभेदी गर्जनेने संपूर्ण रेल्वेस्टेशनचा परिसर दणाणून गेला. बापूजींचे चाळीसगाववासीयांनी जंगी स्वागत केले.

ठळक मुद्देम. गांधी जयंती विशेष :९३ वर्षांपूर्वीच्या स्मृतींचे आजही स्मरण : खादीवर रेखाटलेले मानपत्र देऊन व्यक्त केली कृतज्ञता

जिजाबराव वाघ ।चाळीसगाव : प्रसंग ९३ वर्षांपूर्वीचा असला तरी अजूनही चाळीसगावकरांच्या सन्मानाचा मानबिंदूच आहे. १६ फेब्रुवारी १९२७च्या पहाटे महात्मा गांधी यांचे नागपूर एक्सप्रेसने चाळीसगावच्या रेल्वे स्टेशनवर आगमन झाले. म.गांधीजी की जय! अशा गगनभेदी गर्जनेने संपूर्ण रेल्वेस्टेशनचा परिसर दणाणून गेला. बापूजींचे चाळीसगाववासीयांनी जंगी स्वागत केले. पुढे त्यांच्या स्मृती चिरंतन जपताना जुन्या न.पा. इमारती नजीकच्या परिसराला म. गांधी चौक. असे नाव दिले. हा चौक म्हणजे त्यांच्या स्मृतींची दीपमाळचं! म. गांधी यांच्या चाळीसगाव भेटीचा प्रसंग ज्येष्ठ नागरिकांच्या चर्चेत अधून-मधून येतो.म.गांधींनी आपल्या आयुष्यात भारत भ्रमंती केली होती. खेडी स्वयंपूर्ण व्हावी, असा त्यांचा आग्रह असायचा. ग्रामीण परिसरातील नागरिकांनी स्वावलंबी व्हावे, असे ते नेहमी सांगत. खेड्यातील जनतेचा स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग असावा. यासाठीही बापूजी दौरे करीत. चाळीसगावी झालेले त्यांचे आगमन याच जनजागृतीसाठी होते. त्यामुळे चाळीसगावच्या ऐतिहासिक पानांवर म.गांधीजी यांच्या भेटीचा रोमांचकारी क्षण सुवर्ण अक्षरांनी कोरला गेलाय. गेली अनेक वर्ष बापूजींच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्ताने त्याला उजाळा मिळतो. चाळीसगावकरांचा ऊर अभिमानाने भरुन येतो.बापूजींना दिले 'खादी'वर रेखाटलेले मानपत्रम.गांधी यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्टेशनवर नगरशेट स्व.नारायण बुंदेलखंडी हे गावातील प्रमुख मंडळींसह हजर होते. पुष्पहार घालून बापूजींचे स्वागत केले गेले.सकाळी साडेआठ वाजता लक्ष्मीनारायण मंदिरासमोर लोकमान्य टिळक चौकात म.गांधीजी यांची जाहीर सभा झाली.सभेत बापूजींना विशेष प्रिय असलेल्या खादीवर तांबड्या शाईने रेखाटलेले मानपत्र अर्पण करण्यात आले. मानपत्राचे वाचन नारायण बुंदेलखंडी यांनी केले. यावेळी ५६० रुपयांची थैलीदेखील बापूजींना अर्पण करण्यात आली.खादी चळवळ म्हणजे गोरगरिबांना आधारचाळीसगावकरांच्या प्रेमाने बापूजी भारावून गेले. सत्काराला उत्तर देताना त्यांनी खादी चळवळ का सुरू केली याचे विवेचन केले. ‘खादी चळवळ म्हणजे गोरगरिबांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होय.’ अशा शब्दात खादीचे महत्व विशद केले. जनतेने खादी वापरावी, असे आवाहन त्यांनी केले. बापूजींचा प्रत्येक शब्द चाळीसगाववासी जीवाचा कान करून ऐकत होते. अखेरीस भारत माता की जय! अशी गर्जना करीत बापूजींनी भाषण थांबविले.चाळीसगावकरांचा खादी खरेदीला प्रतिसादबापूजींच्या भाषणाने प्रभावित झालेल्या चाळीसगावकरांनी सभा संपताच खादी खरेदीसाठी गर्दी केली. अवघ्या अर्ध्या तासात २०० रुपयांच्या खादी कापडाची विक्री झाली. खादी खरेदीचा प्रतिसाद पाहून म.गांधी आनंदून गेले.विद्यार्थ्यांना सांगितले ब्रह्मचर्याचे महत्वबापूजींच्या निवासाची सोय 'मनमाड कंपनी' (आताचा सिग्नल चौक) येथे करण्यात आली होती. त्यांनी दिवसभर मान्यवर नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या भेटीसाठी आलेल्या व्यायामशाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी 'ब्रह्मचर्येचे' महत्व समजावून सांगितले. आपल्यातील शक्तीचा वापर देशविधायक कामांसाठी करावा, असा मंत्रही त्यांनी दिला. रात्री साडेदहाला पंजाब एक्सप्रेसने त्यांनी नाशिककडे प्रयाण केले.पालिकेच्या स्मरणिकेत स्मृतींचा जागरचाळीसगाव नगरपरिषदेने २०१९ मध्ये शताब्दी वर्षात पदार्पण केले. १९७१ मध्ये याच पालिकेच्या सुवर्ण महोत्सनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या ‘स्मरणिकेत’ म.गांधीजींच्या चाळीसगाव भेटीच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. तत्कालिन नगराध्यक्ष कै. अनिलदादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कै. वि.वि.भागवत व कै.र. भा. कासार यांनी स्मरणिकेचे संपादन केले होते. १ मे १९७१ रोजी मान्यवरांच्या उपस्थित स्मरणिका प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीChalisgaonचाळीसगाव