शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

Coronavirus: ...तर दृष्टी गमावण्याचाही धोका; कोरोना काळात सांभाळा आपले डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 11:16 IST

जळगाव : कोरोनाची सुरुवात ही डोळ्यांपासून होऊ शकते, कोविडच्या काळात डोळ्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा डोळ्यांना संसर्ग ...

जळगाव : कोरोनाची सुरुवात ही डोळ्यांपासून होऊ शकते, कोविडच्या काळात डोळ्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा डोळ्यांना संसर्ग होऊन त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तसेच काही वेळा रुग्णाला दृष्टी गमवावी लागेल. त्यामुळे स्वच्छता आणि खबरदारीच्या सर्व उपायांचे पालन करावे, असा सल्ला शहरातील नेत्ररोग तज्ज्ञांनी दिला आहे.

आयएमएतर्फे शुक्रवारी कोविड आणि नेत्ररोग या विषयांवर चर्चासत्र पार पडले. त्यात नेत्ररोगतज्ञ डॉ. अंजली चौधरी, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. दर्शना शाह, डॉ. नीलेश चौधरी हे सहभागी झाले होते. उपक्रमासाठी अध्यक्ष डॉ. सी. जी. चौधरी, सचिव डॉ. राधेश्याम चौधरी यांनी परिश्रम घेतले.

डॉ. अंजली चौधरी म्हणाल्या की, सध्याच्या काळात शस्त्रक्रिया थांबल्याने नेत्रबिंदूच्या आजाराचे प्रमाण वाढून दृष्टीदेखील जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले. तसेच कोरोनाच्या लसीचा डोळ्यांवर कोणताही परिमाण होत नाही.

डॉ. धर्मेंद्र पाटील म्हणाले की, मोतिबिंदू आणि नासूरची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी कोविड चाचणी करणे गरजेचे आहे. डोळ्याबाबत काहीही त्रास असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रुग्णांनी वेळोवेळी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. कोरोनामुळे रक्तवाहिनीत एखादी गाठ झाल्यास त्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते.

डॉ. दर्शना शाह म्हणाल्या की, कोविडमध्ये डोळा लाल होतो. घाण येते, पाणी येणे, डोळ्यात जळजळ होणे, खाज येणे अशी काही लक्षणे आहेत. अश्रूंमध्ये कोरोनाचा संसर्ग असल्याचे प्रमाण ७ टक्केपर्यंत आहे. ऑनलाईन शिक्षण आणि लॉकडाऊनमुळे पालक मुलांच्या डोळ्यांबाबत तक्रारी घेऊन येत आहेत. मोबाईल गेम आणि इतर बाबींपासून लांब राहावे, असे डॉ. दर्शना शाह यांनी सांगितले.

डॉ. नीलेश चौधरी म्हणाले की, म्युकोरमायकोसीसच्या घटना पोस्ट कोविड आजारात वाढल्या आहेत. बुरशीजन्य असलेल्या या आजारात संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्यास त्यांच्या मृत्यूची शक्यता ५० टक्केपर्यंत असते. शक्यतो गंभीर आजार असलेले रुग्ण आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तिंना हा आजार होतो, असे डॉ. नीलेश चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्यJalgaonजळगावeye care tipsडोळ्यांची काळजी