शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

७७९ कोटींचे जाऊ द्या हो, आधी खड्ड्यांमध्ये मुरुम टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 1:14 PM

खराब रस्त्यांमुळे पाठ, मणक्याचा त्रास : मुरुम टाकण्याचा मुहूर्त केव्हा?

जळगाव : शहरात सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांची अक्षरश चाळणी झाली आहे. सर्वदूर चिखल पसरला आहे. तसेच खराब रस्ते व खड्डयामुळे वाहनधारकांना पाठ व कंबर दुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे ७७९ कोटींचा निधीतून काय कामे होतील ते करा मात्र, आधी खराब रस्त्यांमध्ये मुरुम टाका असेच जळगावकर म्हणत आहेत.अमृत योजनेमुळे जळगावकरांना कधी नव्हे तेवढा त्रास यंदाच्या पावसाळ्यात सहन करावा लागत आहे. आधी रस्त्यांची पुर्णपुणे वाट लागलेली. त्यातच पाणी पुरवठा योजनेमुळे रस्ते खोदल्यानंतर त्या रस्त्यांची व्यवस्थित दुरुस्ती न झाल्यामुळे खोदण्यात आलेल्या भागाची सर्व माती रस्त्यावर पसरून चिखल तयार झाला आहे. चिखलाचा आधीच त्रास होत असताना त्यातच खराब रस्त्यांमध्ये तयार झालेल्या खड्डयांची भर पडली आहे. रायसोनी नगरात तर पायी चालणेही अवघड झालेले आहे. मोठमोठ्या खड्डयांमुळे वाहनेही फेऱ्याने न्यावी लागत आहे.वाहनांचेही होत आहे नुकसानखराब रस्त्यांमुळे व खड्डयामुळे केवळ माणसांच्या पाठीच्या मणक्यांचीच नाही तर दुचाकी व चारचाकी वाहनांचीही वाट लागत आहे. खड्डयांमुळे मोटारसायकलच्या टायर ट्यूबपासून कारच्या बॉडीपर्यंत अनेक पार्ट्स खराब होत आहेत. शॉकअप खराब होत आहे. तसेच चिखलामुळे वाहने अनेक ठिकाणी घसरत असल्याने लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. रिंगरोड, जिल्हाधिकारी निवासस्थानपुढील रस्ता, शिवाजी नगर या भागातील रस्त्ये मधोमध खोदल्यामुळे सर्वच रस्ते खराब झाले आहेत.पावसानंतर धुलीकणांच्या प्रमाणात होते वाढपावसामुळे सध्या रस्त्यांवर चिखल पसरला आहे. तसेच पाऊस थांबल्यानंतर रस्ते कोरडे झाल्यांनंतर धुलीकणांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ असते. यामुळे देखील आरोग्यवर परिणाम होत असून, श्वसनाचे विकार मोठया प्रमाणात होतात.तसेच अँलर्जी असणाºया रुणांना त्रास होतो. सर्दी, खोकला आणि डोळे चुरचुरणे आदींचा त्रास होऊ शकतो. तसेच धुळीमुळे त्वचेचे विकार होतात.खचलेल्या रस्त्यांमुळे जास्त त्रास‘लोकमत’ ने शहरातील काही पाहणी केली. अमृतमुळे खोदलेल्या ठिकाणी तात्पुरती माती टाकून केलेल्या दुरुस्तीमुळे अनेक ठिकाणी आता पावसामुुळे खोदलेला भाग मुख्य रस्त्यांपासून खोल गेला आहे. त्यामुळे एक ते दीड इंचापासून ४ ते ५ इंच खालीपर्यंतचे शेकडो खड्डे शहरात तयार झाले आहेत. तसेच या खड्डयामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्डयांची खोली देखील वाहनधारकांना कळत नाही.त्यामुळे वाहनधारकांना कंबरेपासून ते मानेपर्यंतच्या भागाला जोरदार झटका बसतो. कंबरेच्या वरील माकड हाड व पाठीचा मणका दाबला जाऊन मानेपर्यंत त्याच्या वेदना जाणवत आहेत. कधी कधी थेट मेंदूपर्यंत कळ जाते. हाडे ठिसूळ असलेल्या व्यक्तीला हा धक्का अतिशय वेदनादायी ठरतो.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव