शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

तब्बल वर्षभरानंतर मनपाकडून दीड कोटीचा निधी महावितरणकडे वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब स्थलांतरासाठी मनपाने अखेर महावितरणकडे दीड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब स्थलांतरासाठी मनपाने अखेर महावितरणकडे दीड कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. मंगळवारी मनपाच्या विद्युत विभागाने दीड कोटी रुपयांचा धनादेश महावितरणकडे वर्ग केला आहे. गेल्या वर्षभरापासून या निधीच्या प्रश्नावरून हे काम थांबले होते. एकीकडे मनपाने दीड कोटी रुपयांचा निधी महावितरणकडे वर्ग केला असला तरी काम सुरू करण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षभरापासून शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम थांबले आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कामामुळेच तब्बल ५ लाख नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या प्रश्नाबाबत ‘लोकमत’ने सातत्याने प्रश्न मांडून मनपा, महावितरण प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तत्काळ या निधीची राज्य शासन व विभागीय आयुक्तांकडून मंजुरी घेऊन, निधी वर्ग करण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. आता निधी वर्ग झाल्याने विद्युत खांब हटविण्याच्या कामाला लवकरच सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य जळगावकर व्यक्त कऱत आहेत.

महावितरणच्या अधिकाऱ्यांचा ‘जळफळाट’

मनपाने हा निधी वर्ग केल्यानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता फारुक शेख यांच्याशी संपर्क साधून विद्युत खांब हटविण्याच्या कामाला सुरुवात केव्हा होईल, याबाबत विचारणा केली असताना, फारूक शेख यांना ५ लाख नागरिकांचा दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या या प्रश्नाबाबत कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून आले. तसेच ‘लोकमत’कडून सातत्याने हा प्रश्न मांडून प्रशासकीय यंत्रणेला धारेवर धरल्याने फारुक शेख यांचा जळफळाट झालेला दिसून आला. तसेच मनपाने निधी वर्ग केल्यावरदेखील निधी वर्ग झाला नसल्याचे सांगत, कामाला केव्हा सुरुवात होईल याबाबत उत्तर देण्याचेही शेख यांनी टाळले.

कोट...

५ लाख नागरिकांच्या प्रश्नाबाबत आता महावितरण प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. दीड कोटींचा निधी तत्काळ वर्ग करण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून आणला. आता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करून, कामाला लवकरच सुरुवात करणे गरजेचे आहे.

- गुलाबराव पाटील, पालकमंत्री

महावितरणकडूनच हे काम होणे गरजेचे होते. महावितरण प्रशासनाच्या ढिसाळ यंत्रणेमुळे या पुलाचे काम थांबले. मनपाने नागरिकांचा विचार करून, आपल्याकडील निधी महावितरणकडे वर्ग केला आहे. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांचे ढिसाळ काम पाहता या कामाला लवकर सुरुवात होईल हे सांगणेही कठीण आहे. आता आठवडाभरात या कामाला सुरुवात झाली नाही तर महावितरणविरोधात जोरदार आंदोलन करू.

- ॲड. दिलीप पोकळे, नगरसेवक