शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कापूस, सोयाबीननंतर आता केळीचेही मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 19:13 IST

अनेक भागात हानी : वादळी पावसाने गाढोदा, कठोरा, किनोद भागात केळीला फटका

जळगाव : अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीन व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे केळीला कोणताही फटका बसला नव्हता. मात्र, गुरुवारी रात्री तालुक्यातील गाढोदा, कठोरा, किनोद, भादली भागात झालेल्या वादळी पावसामुळे केळीच्या कांदेबागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन काढणीवर असलेले केळीचे घड कोसळले असल्याने केळी उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडला आहे.यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाल्यामुळे शेतकºयासमोर कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात संकट उभे ठाकले आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे सोयाबीन, ज्वारी व कापूसचेच नुकसान झाले होते. केळीला तसा जास्त पावसाचा फायदाच झाला होता. मात्र, अरबी समुद्रावर आलेल्या माहा चक्रीवादळाच्या परिणामस्वरुप गुरुवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. कठोरा, भादली, सावखेडा या भागात मोठे नुकसान झाले आहे. तर आव्हाणे, गाढोदा, पळसोद या भागातही काही प्रमाणात नुकसान झाले आहे.केळीचे झालेल्या नुकसानामुळे प्रशासनाने तत्काळ उध्वस्त झालेल्या केळीच्या बागांमध्ये जावून नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी कठोरा येथील शेतकरी गोकुळ मोहन जाधव यांनी केले आहे. गाढोदा परिसरात देखील निलेश रामचंद्र पाटील यांच्या केळीचाही बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कापूस काढण्यासाठी मोठी कसरत सुरुशेतांमध्ये कापूस फुलला आहे अनेक ठिकाणी कापसाचे नुकसान झाले आहे. मात्र, ज्या भागात कापूस शेतांमध्ये फुलला आहे. तो कापूस वेचताना शेतकरी व मजूरांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. शेतरस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यामुळे शेतकऱ्यांना बैलगाडी शेतापर्यंत नेता येत नाही. त्यातल्या त्यात कापूस वेचणीसाठी मजूर शेतामध्ये जरी पोहचले तरी चिखलामुळे पाय शेतांमध्ये रुतत असल्याने कापूस वेचणी करताना मोठ्या प्रमाणात त्रास करावा लागत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव