शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

कापूस, सोयाबीननंतर आता केळीचेही मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 19:13 IST

अनेक भागात हानी : वादळी पावसाने गाढोदा, कठोरा, किनोद भागात केळीला फटका

जळगाव : अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीन व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे केळीला कोणताही फटका बसला नव्हता. मात्र, गुरुवारी रात्री तालुक्यातील गाढोदा, कठोरा, किनोद, भादली भागात झालेल्या वादळी पावसामुळे केळीच्या कांदेबागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन काढणीवर असलेले केळीचे घड कोसळले असल्याने केळी उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडला आहे.यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाल्यामुळे शेतकºयासमोर कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात संकट उभे ठाकले आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे सोयाबीन, ज्वारी व कापूसचेच नुकसान झाले होते. केळीला तसा जास्त पावसाचा फायदाच झाला होता. मात्र, अरबी समुद्रावर आलेल्या माहा चक्रीवादळाच्या परिणामस्वरुप गुरुवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. कठोरा, भादली, सावखेडा या भागात मोठे नुकसान झाले आहे. तर आव्हाणे, गाढोदा, पळसोद या भागातही काही प्रमाणात नुकसान झाले आहे.केळीचे झालेल्या नुकसानामुळे प्रशासनाने तत्काळ उध्वस्त झालेल्या केळीच्या बागांमध्ये जावून नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी कठोरा येथील शेतकरी गोकुळ मोहन जाधव यांनी केले आहे. गाढोदा परिसरात देखील निलेश रामचंद्र पाटील यांच्या केळीचाही बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कापूस काढण्यासाठी मोठी कसरत सुरुशेतांमध्ये कापूस फुलला आहे अनेक ठिकाणी कापसाचे नुकसान झाले आहे. मात्र, ज्या भागात कापूस शेतांमध्ये फुलला आहे. तो कापूस वेचताना शेतकरी व मजूरांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. शेतरस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यामुळे शेतकऱ्यांना बैलगाडी शेतापर्यंत नेता येत नाही. त्यातल्या त्यात कापूस वेचणीसाठी मजूर शेतामध्ये जरी पोहचले तरी चिखलामुळे पाय शेतांमध्ये रुतत असल्याने कापूस वेचणी करताना मोठ्या प्रमाणात त्रास करावा लागत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव