शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संसर्गासह मृत्यूदर रोखण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ - नूतन जिल्हाधिकारी अभिजित राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 12:28 IST

परिस्थिीची माहिती घेत सर्वांना सोबत घेऊन नियोजन करणार

विजयकुमार सैतवालजळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग व मृत्यूदर रोखण्यासाठी यापूर्वीही येथे अधिकाऱ्यांनी उपाययोजना केल्याच आहे. आता आपण यासाठी येथील परिस्थितीची माहिती घेऊन व सर्वांना सोबत घेऊन कृती आराखडा (अ‍ॅक्शन प्लॅन) तयार करून कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचा मनोदय नूतन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांची जळगावच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली. गुरुवार, १८ जून रोजी संध्याकाळी ते जळगावात पोहचले व पदभार स्वीकारला.जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता विविध मुद्यांवर त्यांनी मनमोकळी चर्चा केली.प्रश्न : कोरोनाच्या संकटात ही जबाबदारी आली असताना या कडे आपण कसे बघतात?उत्तर : प्रशासकीय सेवेत काम करीत असताना विविध जबाबदाºया पार पाडाव्या लागतातच. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी आली असली तरी ती संधी समजून जनतेच्या हितासाठी निर्णय घेतले जातील. प्रथम ‘कोरोना’वर अधिक लक्ष केंद्रीत राहणार आहे. या साठी आढावा घेत संपूर्ण टीमला सोबत घेऊन कोरोना रोखण्यावर भर राहणार आहे.प्रश्न : जिल्ह्यात रुग्णसंख्येसोबतच मृत्यूदरही वाढता असल्याने यासाठी कसे नियोजन असेल?उत्तर : वाढता मृत्यूदर ही बाब चिंताजनक आहेच. मात्र आपल्याला त्यावर मात करायची असल्याने त्या विषयी आपण नियोजन केले आहे. पदभार घेतल्यानंतर येथील सर्व परिस्थिती जाणून घेऊन मृत्यू रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील.प्रश्न : रुग्ण संख्या व मृत्यू कमी करण्यासाठी काही लक्ष्य ठेवले आहे का?उत्तर : तसे कोरोनामुक्ती हेच कोणत्याही अधिकाºयाचे लक्ष्य असेल. कोरोना उपाययोजनांसाठी आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचना तसेच केंद्र सरकार, राज्य सरकारच्या सूचना व आदेशाच्या अनुषंगाने उपाययोजना केल्या जातील. हे करीत असताना सर्वांना सोबत घेऊन काम करू.प्रश्न : कोरोनासोबतच जिल्ह्यात वाळूचा मोठा प्रश्न आहे, त्याचे काही नियोजन असेल का?उत्तर : शासन हिताचा विषय असेल तेथे लक्ष दिले जाईलच. सध्याच्या परिस्थितीत प्रथम प्राधान्य कोरोना उपाययोजनांवर राहणार आहे. मात्र हे करीत असताना गैर कारभारकडेही दुर्लक्ष केले जाणार नाही.प्रश्न : जळगाव जिल्ह्यात टँकरची मोठ्या संख्या असते, याबाबत कसे नियोजन असेल?उत्तर : गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने सांगली जिल्ह्यात महापूर आला व अनेक जण बाधित झाले. ती परिस्थिती हाताळण्यात यशस्वी झालो. महाराष्ट्रात टंचाई व त्या अनुषंगाने टँकर हा विषय असतो. मात्र आता गेल्या वर्षाच्याच पावसामुळे टँकरची संख्या कमी राहिली व जळगाव जिल्ह्यातही अशीच स्थिती असेल. भविष्यात टंचाई उद््भवलीच तर त्याच्या निवारार्थ आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.तीन पुरस्कारांनी सन्मानितनवे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत हे सांगली येथे जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून कार्यरत होते. तेथील तीन वर्षाच्या कालावधीत राज्य शासनाचा पंचायत राज पुरस्कार तसेच केंद्र सरकारचा स्वच्छता दर्पण हा पुरस्कार जिल्हा परिषदेला मिळाला. तसेच ग्रामीण विकासासाठी त्यांना कास्य पदकदेखील मिळालेले आहे.२०१४ ते २०१५ या काळात राऊत यांनी प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. या सोबतच केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागात शालेय शिक्षण विभागाचे सहायक सचिव, नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे २०१५ ते २०१७ या काळात सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.आयएएस असलेले राऊत हे सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मे २०१७ पासून कार्यरत होते. सांगलीत गतवर्षी आॅगस्टमध्ये आलेल्या महापुरात कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या १०४ गावांना तडाखा बसला होता. या परिस्थितीत जिल्हा परिषदेने आपत्कालीन यंत्रणा उत्तमपणे राबवली होती. पुरानंतर साथीच्या रोगाचा प्रसार होणार नाही, याबाबत घेण्यात आलेली खबरदारी त्यांच्या प्रयत्नाने यशस्वी झालेली होती. त्यांच्या कार्यकाळात तेथे विकासकामांना गती मिळाली.

टॅग्स :Jalgaonजळगाव