शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

'एका जिल्ह्याची टंचाई परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी शिखर बँकेने स्वीकारावी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 18:08 IST

गोलाणी मार्केट येथे महाराष्ट्र राज्य को. ऑप बॅक मर्यादित, मुंबई च्या ४९ व्या जळगाव येथील नवीन शाखेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकात पाटील व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देराज्यातील एका जिल्ह्याची टंचाई परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी शिखर बँकेने स्वीकारावी - पालकमंत्री चंद्रकात पाटील शिखर बँकेने 30 हजार कोटीपर्यंत व्यवसाय केला असून बँक प्रगतीचे वेगवेगळे शिखर गाठीत असल्याचेही सांगितले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज देवून सहकार्य करावे.

जळगाव - राज्यातील दुष्काळी परिस्थितीत टंचाईचे संकट दिवसेंदिवस बिकट होत असताना या टंचाईच्या परिस्थितीत राज्यातील कुठल्याही एका जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना पाणी व चारा तसेच छावण्या उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी दि. महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई यांनी स्वीकारावी असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

गोलाणी मार्केट येथे आज महाराष्ट्र राज्य को. ऑप बॅक मर्यादित, मुंबई च्या ४९ व्या जळगाव येथील नवीन शाखेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकात पाटील व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हॉटेल सिल्व्हर पॅलेस येथे ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख होते. तर प्रमुख अतिथी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आ. स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे, बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, समिती सदस्य अविनाश महागांवकर, संजय भेंडे, डॉ. अजित देशमुख आदि उपस्थित होते. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, 4 वर्षापूर्वी बँकांची परिस्थिती वेगळी होती. आज शिखर बँकेने 30 हजार कोटीपर्यंत व्यवसाय केला असून बँक प्रगतीचे वेगवेगळे शिखर गाठीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्य सहकारी बँकेने ठरविले तर राज्यातील 4 हजार कृषी मंडळात ते फ्रुट प्रोसेसिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देऊ शकतात. या उद्योगातून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला पैसा मिळेल. लोकांना रोजगार उपलब्ध होईल व छोट्या उद्योगांना चालना मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आपल्या भाषणात राज्याचे सहाकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, शिखर बँकेने ग्रामीण भागात बँकाचे जाळे पसरवून नाविन्यपूर्ण शाखा कार्यान्वित कराव्यात. राज्यात सहकार क्षेत्र समृद्ध होत नाही तो पर्यंत महाराष्ट्र राज्य अधिक समृद्ध होणार नाही. यासाठी शासन व सर्वसामान्य माणसांनी सहकार्याची करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील १ हजार ८०० वेगवेगळ्या संस्थाना शासकीय मदत न देता त्या समृद्ध झाल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, राज्यात ४ लाख बचतगट असून या बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजार पेठ उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्या मालाची विक्रीची समस्या सुटणार आहे. बचत गटांतील महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, साहित्य बनविण्याचे प्रशिक्षण शिखर बॅकेच्या सहकार्याने दिले तर फार मोठी उपलब्धी होऊ शकते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सहकार मंत्री देशमुख पुढे म्हणाले की, शिखर बँकेने सर्व सहकारी संस्थाना सदस्य करुन राज्यातील ४ लाख कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. यातून राज्याचे सहकार क्षेत्र खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. राज्यातील अनेक पतसंस्था डबघाईला आल्या असून ठेवीदारांनी आकर्षक व्याज देणाऱ्या पतसंस्थापासून सावध राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करुन देणे ही बँकांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. एक ही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता बॅंकांनी घ्यावी, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्ह्यात वेगवेगळया पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवींचा प्रश्न गंभीर असून 400 कोटी रुपयांच्या ठेवी ठेवीदारांनी पतसंस्थांच्या भरोसावर ठेवल्या असून त्यातील  काही पतसंस्था डबघाईस आल्यामुळे ठेवीदारांचे मोठे नुकसान झालेले आहे. ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी व पतसंस्थांच्या सक्षमीकरणासाठी सहकार विभागाचे प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज देवून सहकार्य करावे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.  

शिखर बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर बॅंकेविषयी माहिती देताना म्हणाले की, प्रत्येक शहरात शिखर बॅंकेची एक शाखा आवश्यक असून शाखा उघडण्यासाठी प्रयत्न केला जाईल. बॅकेच्या संचालक मंडळाने बॅंकेच्या धोरणात अमुलाग्र बदल केला आहे. बॅंकेमार्फत शेतकरी, गरीब माणसाला मोठ्या प्रमाणात मदत करता येईल यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, राज्य सहकारी बॅंकेला 400 कोटी रुपयांचा नफा मिळल्याचेही त्यांनी सांगितले. बॅंक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून यशाकडे वाटचाल करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलJalgaonजळगावbankबँकFarmerशेतकरी