शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

गायीच्या पोटातून काढला तब्ब्ल ४० किलो प्लास्टिक कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:16 IST

जळगाव : घरासमोर बसलेल्या गायीची प्रकृती खराब असल्याचे जाणवताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचारासाठी बोलावून समर्थ काॅलनीतील वाणी कुटुंबीयांनी तत्परता दाखविली. ...

जळगाव : घरासमोर बसलेल्या गायीची प्रकृती खराब असल्याचे जाणवताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचारासाठी बोलावून समर्थ काॅलनीतील वाणी कुटुंबीयांनी तत्परता दाखविली. या गायीच्या पोटातून तब्बल ४० किलोचा प्लास्टिक कचरा काढण्यात डाॅक्टरांना यश आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान या गायीचा मृत्यू झाला. बेवारस जनावरांसाठी प्लास्टिक कचरा कसा घातक ठरतोय, हे या घटनेच्या निमित्ताने समोर आले आहे.

शहरातील समर्थ कॉलनीत राहणारे मिलिंद वाणी यांच्या घरासमोर रविवारी सकाळपासून दोन बेवारस गायी बसलेल्या होत्या. यातील एक गाय उठून दुसरीकडे गेली तर एक गाय दुपारी चार वाजल्यानंतरही जागेवरच बसून होती. वाणी यांनी या गायीजवळ जाऊन पाहिले असता त्यांना गाय आजारी असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ महाबळ येथील पशु वैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांना उपचारासाठी बोलावले. यावेळी संबंधित डॉक्टरांनी गायीवर उपचार करून, ही गाय वाचण्याची शक्यता कमी असल्याचे सांगत गाईला कोंडवाड्यात सोडण्यास सांगितले. यानंतर वाणी यांनी या गायीची माहिती पांझरपोळ गोशाळेचे संचालक विजय काबरा यांना दिली. काबरा यांनी तत्काळ गायीला पांझरपोळ संस्थेत आणण्यास सांगितले.

इन्फो :

डॉक्टरांनी गायीच्या पोटातून काढले ४० किलो प्लास्टिक

मिलिंद वाणी, आदित्य वाणी, अभिषेक वाणी, रोहन नेवे तसेच त्यांचे इतर सहकारी भवानी अग्रवाल, जयेश मित्तल, राज नावडे, लतेश भोळे, ऋषिकेश रावेरकर यांनी एका गाडीतून या गायीला पांझरपोळ गोशाळेत दाखल केले. या ठिकाणी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज राजपूत व डॉ. अश्विनी दाभाडे यांनी या गायीवर शस्त्रक्रिया केली. तब्बल तीन तास शस्त्रक्रिया करून प्लास्टिक पिशव्यांचा कचरा, वायर आदी प्रकारचा ४० किलो कचरा काढण्यात आला.

इन्फो :

शस्त्रक्रियेनंतर काही तासातच गायीने सोडले प्राण

डॉक्टरांनी तत्काळ गायीवर शस्त्रक्रिया केली. मात्र, प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे गायीच्या पोटात मोठ्या प्रमाणात इजा झाल्यामुळे प्रकृती अधिकच खालावली होती. शस्त्रक्रिया करून पोटातील प्लास्टिक काढल्यानंतर गायीने काही तासातच प्राण सोडले.

इन्फो :

प्लास्टिक पिशव्या उघड्यावर न फेकण्याचे आवाहन

शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली असली तरी, शहरात बिनधास्तपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे. नागरिक या पिशव्या उघड्यावरच फेकत असल्यामुळे, बेवारस जनावरे या पिशव्या खात आहेत. त्यामुळे या पिशव्या बेवारस जनावरासांठी घातक ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या उघड्यावर फेकू नये, असे आवाहन पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.