शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

अबब.. विजेची जोडणी नसतानाही शेतकऱ्याला दीड लाखाचे वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:21 IST

जळगाव : नियमानुसार वीज जोडणीसाठी लागणारे सर्व शुल्क भरूनही महावितरणने सात वर्षांपासून जोडणी न करता, रायपूर येथील एका ...

जळगाव : नियमानुसार वीज जोडणीसाठी लागणारे सर्व शुल्क भरूनही महावितरणने सात वर्षांपासून जोडणी न करता, रायपूर येथील एका शेतकऱ्याला चक्क दीड लाख रुपयाचे वीज बिल पाठविले आहे. हे वीज बिल पाहून संबंधित शेतकरी बांधवाला चांगलाच धक्का बसला असून, या प्रकारामुळे महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. तसेच या बिलानंतर संबंधित शेतकऱ्याने महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही बिलाबाबत न्याय मिळत नसल्यामुळे, हे बिल कसे भरावे, असा प्रश्न या शेतकऱ्यासमोर पडला आहे. दिलीप कडू धनगर (रा. रायपूर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

तालुक्यातील रायपूर येथील रहिवासी दिलीप कडू धनगर यांची रायपूर गावाला लागून गट नंबर १०३-१ मध्ये स्वत: च्या मालकीची शेती आहे. या शेतात त्यांनी २०१४ साली बोअरवेल केली होती. बोअरवेलचे पाणी उपसण्यासाठी दिलीप धनगर यांनी महावितरणच्या चिंचोली येथील कार्यालयाकडे वीज जोडणी मिळण्याबाबत लेखी अर्ज केला होता. अर्जानंतर वीज पुरवठा मिळण्यासाठी धनगर यांनी २५ मार्च २०१४ रोजी ७ हजार रुपये इतकी डिमांड रक्कमही महावितरणकडे भरली होती. मात्र, सात वर्षे उलटल्यानंतरही महावितरणने धनगर यांना वीज जोडणी दिलेली नाही. विजेची जोडणी मिळण्याबाबत दिलीप धनगर या शेतकऱ्याने अनेकवेळा चिंचोली कार्यालयात चकरा मारल्या. मात्र, अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी कारणे सांगण्यात येत असल्यामुळे धनगर यांनी वीज जोडणी मिळणार नसल्याचे गृहीत धरून महावितरणच्या कार्यालयात जाणेही बंद केले आहे.

इन्फो :

...अन् जोडणी नसतानाही आले दीड लाखाचे बिल

दिलीप धनगर यांनी गेल्या सात वर्षाेत अनेकदा महावितरणच्या कार्यालयात चकरा मारूनही, वीज जोडणी मिळाली नाही. मात्र, गेल्या आठवड्यात धनगर यांना थेट १ लाख ५४ हजार ९७० रुपयांचे वीज बिल आले आहे. शेतात वीज जोडणी नाही, मीटर नाही, त्यामुळे हे बिल कसे आले, याबाबत दिलीप धनगर यांनी अनेकवेळा महावितरणच्या रायपूरजवळील चिंचोली कार्यालयात तक्रारी केल्या. मात्र, अद्यापही धनगर यांचे देण्यात आलेल्या बिलाचे कारण सांगण्यात आलेले नाही. दरम्यान, या प्रकाराबाबत चिंचोली येथील महावितरणचे सहायक अभियंता एस. आर. राऊत यांच्यांशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

इन्फो :

माझ्या शेतात वीज जोडणीसाठी २५ मार्च २०१४ मध्ये डिमांड नोट भरूनही महावितरण प्रशासनाने वीज जोडणी दिलेली नाही. वरून नंबर आल्यावर, वीज जोडणी होणार असल्याचे सात वर्षांपासून सांगण्यात येत आहे. मात्र, सात वर्षांत विजेची जोडणी नसताना दीड लाखाचे वीजबिल आल्यामुळे मला धक्काच बसला आहे. या बिलाबाबत चिंचोली कार्यालयात अनेकवेळा जाऊनही न्याय मिळालेला नाही.

-दिलीप धनगर, शेतकरी, रायपूर