- प्रशांत भदाणे जळगाव - जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे एका १४ वर्षीय मुलाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजेश गजानन महाजन असं हत्या झालेल्या मुलाचे नाव असून, हा खून नरबळीसाठी करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार राजेश महाजन हा मुलगा काल संध्याकाळपासून बेपत्ता होता. कुटुंबीयांना खूप शोधाशोध केल्यावरही तो सापडला नव्हता. दरम्यान, आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारा,स गावाच्या शेजारीच काटेरी झुडपांमध्ये राजेशचा मृतदेह सापडला. राजेश याचा गळा चिरून त्याची हत्या करण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान, या प्रकरणी तपास करत असलेल्या पोलिसांनी राजेश याचा खून नरबळीसाठी करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला आहे.