शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जिल्ह्यात विद्यार्थी आधार नोंदणीचे काम ९० टक्के पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:29 IST

जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या एकूण ३ हजार ३७५ शाळा असून, ८ लाख ७८ हजार ९३४ विद्यार्थी संख्या आहे. ...

जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या एकूण ३ हजार ३७५ शाळा असून, ८ लाख ७८ हजार ९३४ विद्यार्थी संख्या आहे. यातील ७ लाख ९२ हजार ६५१विद्यार्थ्यांचे विद्यार्थी पोर्टलवर आधार कार्ड नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. तर ८६ हजार २८३ विद्यार्थ्यांचे नोंदणीचे काम अपूर्ण आहे. सध्या स्थितीला एकूण ९० टक्के आधार नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. या नोंदणी करण्यामध्ये भुसावळ तालुका आघाडीवर असून, ६७ हजार ३३० विद्यार्थ्यांपैकी ६४ हजार ९९८ विद्यार्थ्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्या खालोखाल एरंडोल तालुक्यात ३२ हजार २३६ पैकी ३० हजार ७०४ विद्यार्थ्यांचे आधार लिकिंग झाले आहे. तर सर्वात कमी जळगाव शहरात १ लाख २ हजार ९६६ विद्यार्थ्यांपैकी ८६ हजार ६७८ विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झाली आहे. दरम्यान, जळगाव शहरातील शाळांकडून दिलेल्या उद्दिष्टानुसार आधार नोंदणीचे काम सुरू असल्यामुळे, गेल्याच आठवड्यात जि.प. शिक्षण विभागातर्फे शहरातील सर्व प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन तातडीने विद्यार्थांच्या आधार लिकिंगचे काम पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर पुढील आठवड्यात माध्यामिकच्या मुख्याध्यापकांचीही बैठक घेण्यात येणार आहे.

इन्फो :

जिल्ह्यातील शाळांनी शिक्षक संच मान्यतेसाठी ३१ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांचे विद्यार्थी पोर्टलवर आधार कार्ड नोंदणी करणे गरजेचे असून, आतापर्यंत जिल्ह्यात ९० टक्के नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी व माध्यामिक शिक्षणाधिकारी यांच्या सूचनेनुसार या कामाचा केंद्रनिहाय दैनंदिन आढावाही घेण्यात येत असून, लवकरच १०० टक्के नोंदणीचे काम पूर्ण होईल.

विजय पवार, प्रभारी उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव