शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

यावल तालुक्यातील सांगवी बुद्रूक येथे दोन वर्षात लोकसहभागातून जलसंधारणाची ५० कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 6:01 PM

यावल तालुक्यातील सांगवी बुद्रूक येथे गेल्या दोन वर्षात लोकसहभागातून जलसंधारणाची ५० कामे झाली. यातून लाखो लीटर्स पाणी अडविल्याने गावातील पाणीटंचाई आटोक्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देलाखो लीटर्स पाणी अडविल्याने गावातील पाणीटंचाई आटोक्यातनदी पात्रात तलाव सदृष्य खड्ड्यांमध्ये जमिनीत जिरविले जाते पाणी१०० टक्के वृक्ष संगोपन

डी.बी.पाटीलयावल, जि.जळगाव : तालुक्यातील सांगवी बुद्रूक येथे गेल्या दोन वर्षात लोकसहभागातून जलसंधारणाची ५० कामे झाली. यातून लाखो लीटर्स पाणी अडविल्याने गावातील पाणीटंचाई आटोक्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.दरवर्षी उन्हाळ्यात तालुक्यात जलपातळी खोल जात असल्याने शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने अनेकांना पाणी अडवा-पाणी जिरवा योजनेसह वृक्ष लागवडीची आठवण होते. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा पुढील उन्हाळ्यापर्यंत त्यावर कोणीही बोलत नसल्याची गेल्या अनेक उदाहरणे आहेत. मात्र तालुक्यातील सांगवी येथील ग्रामस्थांनी गेल्या वर्षापासून नदी पात्रात जलबंधारे आणि लाखो लीटर्स पाणी जिरविण्यासाठी सुरू केलेली योजना या वर्षातही सुरू ठेवली असून, गेल्या वर्षी ४० तर या वर्षात सात अशी जलसंधारणाची कामे लोकसहभागातून केली असल्याने तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. त्या पाठोपाठ आता तालुक्यात अनेक गावात या योजना सूर झाल्या आहेत.यावल-फैजपूर रस्त्यावरील सांगवी बुद्रूक येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने गेल्या वर्षी नदी परिसरात ४० जलसंधारणाची कामे केली. यात प्रामुख्याने माती बंधारे लाखो लीटर्स पाणी मावेल असे मोठमोठे तलाव सदृष्य खड्डे तयार करणे यासारखी कामे केली होती. त्याचा फायदा या गावासाठी निश्चितच झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. तालुक्यात अनेक गावांना यावर्षी पाणीटंचाई उद्भवली. मात्र सांगवीमध्ये पाणीटंचाई नाही. गावचे सांडपाणीसुद्धा नदी पात्रातील खड्ड्यामधून जिरविले जात आहे.गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षातही ग्रामस्थांनी लोकसहभागतून मागील वर्षाचे सहा खड्डे पुनरुज्जीवित करून नव्याने १०० बाय ५० बाय १२ फूट ज्यात १७ लाख १७ हजार लीटर्स पाणी मावेल, तर दुसरा २३१ बाय २७ बाय १२ फुटांच्या खोलीचा ज्यात ३२ लाख ७० हजार लीटर्स पाणी मावेल, आणि तिसरा ११२ बाय २७ बाय १० फूट खोलीचा आठ लाख ७० हजार लीटर खोलीचे तलाव सदृष्य खड्डे केले आहेत.मागील वर्षाचे आणि या वर्षाचे मिळून ग्रामस्थांनी परिसरात ५० जलसंधारणाची कामे केली. त्यासाठी ग्रामस्थांनी मागील वर्षी सुमारे सात लाखांचा निधी जमा केला होता. त्यातील पाच लाख जलसंधारणावर खर्च केले तर एक लाख रुपये वृक्ष लागवडीवर खर्च केले.१०० टक्के वृक्ष संगोपनशासकीय यंत्रणेव्दारा दरवर्षी लाखो वृक्ष लागवड होते आणि दुसऱ्या वर्षी परत त्याच खड्ड्यातून वृक्ष लागवड होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र सांगवीकरांनी गेल्या वर्षी गावात केवळ १२६ वक्ष लावले.वृक्ष लागवड करताना एक हजार रुपये, दीड हजार रुपये किमतीची मोठी झाडे आणून त्यांचे संगोपन केल्याने १०० टक्के वृक्ष लागवड यशस्वी झाल्याचे तलाठी एस.के.पाटील यांनी सांगितले. या योजनेसाठी गावातील अमोध कोळंबे, अतुल उल्हास चौधरी, दीपक चौधरी, पी. एम. भंगाळे, दीपक भंगाळे, योगेश भंगाळे, विकास भंगाळे, भालचंद भंगाळे यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले असल्याचे तलाठी पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईYawalयावल