शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

बीएचआरच्या ५ जणांनी केली ६२ कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST

जळगाव/ पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को. ऑप सोसायटी (बीएचआर)मधील आरोपींनी पुण्यातील चार व जळगावातील एक अशा ५ ...

जळगाव/ पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को. ऑप सोसायटी (बीएचआर)मधील आरोपींनी पुण्यातील चार व जळगावातील एक अशा ५ मालमत्ता कवडीमोल किंमतीला विकून ठेवीदारांचे तब्बल ४८ कोटी ५६ लाख रुपयांचे नुकसान केले. अटकेतील पाच आरोपींनी आतापर्यंतच्या तपासात ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेने पाच आरोपींविरुद्ध विशेष न्यायालयात २४०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.

याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, तपासअधिकारी पोलीस निरीक्षक सुचेता खोकले यांनी माहिती दिली.सुजित सुभाष बावीस्कर ऊर्फ वाणी (वय ४२), धरम किशोर साखला (वय ४०),महावीर मानकचंद जैन (वय ३७), विवेक देविदास ठाकरे (वय ४५), कमलाकर भिकारी कोळी (वय २८, सर्व रा. जळगाव) अशी दोषारोपपत्र दाखल केलेल्यांची नावे आहेत. फिर्यादी रंजना घोरपडे व त्यांची बहिण या दोघींनी गुंतवणूक केलेले १६ लाख ९० हजार १४२ रुपये तसेच पतसंस्थेची पुणे येथील घोले रोड, पिंपळे गुरव, आंबेगाव, निगडी व जामनेर येथील मालमत्ता कमी किंमतीत विकून त्यामध्ये ४८ कोटी ५६ लाख २५ हजार ८२० रुपयांचा अपहार तर १३ कोटी १७ लाख ७२ हजार २०१ रुपयांचा संशयास्पद व्यवहार असा एकूण ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, सूरज झंवर व इतर संशयितांचा तपास अजून सुरु असल्याने त्यांचे दोषारोप विहीत वेळेत सादर केले जाणार असल्याची माहिती नवटके यांनी दिली.

शासनाने बीएचआरवर प्रशासक म्हणून २०१५ मध्ये जितेंद्र कंडारे याची नेमणूक केली होती. त्याने अटक आरोपी व इतरांशी संगनमत करुन पतसंस्थेच्या मालमत्ता बनावट वेबसाईट तयार करुन सुनिल झंवर व त्यांच्या फर्मच्या नावे बेकायदेशीरित्या वर्ग करुन पूर्ण मोबदला न देता ठेवीदारांच्या पावत्या ३०टक्क्यांने विकत घेऊन त्यांच्या ७० टक्के रक्कमेचा व संस्थेच्यामालमत्तेचा अपहार केला.

मर्यादीत जणांनीच भरले टेंडर

दरम्यान, या आरोपींनी कृणाल शहा याच्याकडून खाजगी वेबसाईट तयार करुन त्यावर पुण्यातील निगडी, घोले रोड, पिंपळे गुरव, आंबेगाव खुर्द आणि जळगाव येथील पतसंस्थेच्या स्थावर मालमत्ता विक्रीची निविदा काढली. त्यात मर्यादित लोकांनी टेंडर भरुन या मालमत्ता केवळ ७ कोटी ७५ लाख ५४ हजार १२१ रुपयांना विकल्या. त्यामुळे पतसंस्थेचे ४८ कोटी ५६ लाख २५ हजार ८२० रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले.अवसायक जितेंद्र कंडारेने पतसंस्थेची कर्जवसुली करुन तसेच मालमत्ता विकून त्याचे सर्व ठेवीदारांचे देणे समान तत्वाचा वापर करुन वितरीत करणे अपेक्षित होते. मात्र, त्याने ठेवीदारांना केवळ ३० टक्के पैसे देऊन त्यांच्याकडून १०० टक्के पैसे मिळाल्याचे लिहून घेऊन कर्जदारांना फायदा करुन दिला.