शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

बीएचआरच्या ५ जणांनी केली ६२ कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST

जळगाव/ पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को. ऑप सोसायटी (बीएचआर)मधील आरोपींनी पुण्यातील चार व जळगावातील एक अशा ५ ...

जळगाव/ पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को. ऑप सोसायटी (बीएचआर)मधील आरोपींनी पुण्यातील चार व जळगावातील एक अशा ५ मालमत्ता कवडीमोल किंमतीला विकून ठेवीदारांचे तब्बल ४८ कोटी ५६ लाख रुपयांचे नुकसान केले. अटकेतील पाच आरोपींनी आतापर्यंतच्या तपासात ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेने पाच आरोपींविरुद्ध विशेष न्यायालयात २४०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.

याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, तपासअधिकारी पोलीस निरीक्षक सुचेता खोकले यांनी माहिती दिली.सुजित सुभाष बावीस्कर ऊर्फ वाणी (वय ४२), धरम किशोर साखला (वय ४०),महावीर मानकचंद जैन (वय ३७), विवेक देविदास ठाकरे (वय ४५), कमलाकर भिकारी कोळी (वय २८, सर्व रा. जळगाव) अशी दोषारोपपत्र दाखल केलेल्यांची नावे आहेत. फिर्यादी रंजना घोरपडे व त्यांची बहिण या दोघींनी गुंतवणूक केलेले १६ लाख ९० हजार १४२ रुपये तसेच पतसंस्थेची पुणे येथील घोले रोड, पिंपळे गुरव, आंबेगाव, निगडी व जामनेर येथील मालमत्ता कमी किंमतीत विकून त्यामध्ये ४८ कोटी ५६ लाख २५ हजार ८२० रुपयांचा अपहार तर १३ कोटी १७ लाख ७२ हजार २०१ रुपयांचा संशयास्पद व्यवहार असा एकूण ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, सूरज झंवर व इतर संशयितांचा तपास अजून सुरु असल्याने त्यांचे दोषारोप विहीत वेळेत सादर केले जाणार असल्याची माहिती नवटके यांनी दिली.

शासनाने बीएचआरवर प्रशासक म्हणून २०१५ मध्ये जितेंद्र कंडारे याची नेमणूक केली होती. त्याने अटक आरोपी व इतरांशी संगनमत करुन पतसंस्थेच्या मालमत्ता बनावट वेबसाईट तयार करुन सुनिल झंवर व त्यांच्या फर्मच्या नावे बेकायदेशीरित्या वर्ग करुन पूर्ण मोबदला न देता ठेवीदारांच्या पावत्या ३०टक्क्यांने विकत घेऊन त्यांच्या ७० टक्के रक्कमेचा व संस्थेच्यामालमत्तेचा अपहार केला.

मर्यादीत जणांनीच भरले टेंडर

दरम्यान, या आरोपींनी कृणाल शहा याच्याकडून खाजगी वेबसाईट तयार करुन त्यावर पुण्यातील निगडी, घोले रोड, पिंपळे गुरव, आंबेगाव खुर्द आणि जळगाव येथील पतसंस्थेच्या स्थावर मालमत्ता विक्रीची निविदा काढली. त्यात मर्यादित लोकांनी टेंडर भरुन या मालमत्ता केवळ ७ कोटी ७५ लाख ५४ हजार १२१ रुपयांना विकल्या. त्यामुळे पतसंस्थेचे ४८ कोटी ५६ लाख २५ हजार ८२० रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले.अवसायक जितेंद्र कंडारेने पतसंस्थेची कर्जवसुली करुन तसेच मालमत्ता विकून त्याचे सर्व ठेवीदारांचे देणे समान तत्वाचा वापर करुन वितरीत करणे अपेक्षित होते. मात्र, त्याने ठेवीदारांना केवळ ३० टक्के पैसे देऊन त्यांच्याकडून १०० टक्के पैसे मिळाल्याचे लिहून घेऊन कर्जदारांना फायदा करुन दिला.