शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

बीएचआरच्या ५ जणांनी केली ६२ कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST

जळगाव/ पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को. ऑप सोसायटी (बीएचआर)मधील आरोपींनी पुण्यातील चार व जळगावातील एक अशा ५ ...

जळगाव/ पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को. ऑप सोसायटी (बीएचआर)मधील आरोपींनी पुण्यातील चार व जळगावातील एक अशा ५ मालमत्ता कवडीमोल किंमतीला विकून ठेवीदारांचे तब्बल ४८ कोटी ५६ लाख रुपयांचे नुकसान केले. अटकेतील पाच आरोपींनी आतापर्यंतच्या तपासात ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेने पाच आरोपींविरुद्ध विशेष न्यायालयात २४०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.

याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, तपासअधिकारी पोलीस निरीक्षक सुचेता खोकले यांनी माहिती दिली.सुजित सुभाष बावीस्कर ऊर्फ वाणी (वय ४२), धरम किशोर साखला (वय ४०),महावीर मानकचंद जैन (वय ३७), विवेक देविदास ठाकरे (वय ४५), कमलाकर भिकारी कोळी (वय २८, सर्व रा. जळगाव) अशी दोषारोपपत्र दाखल केलेल्यांची नावे आहेत. फिर्यादी रंजना घोरपडे व त्यांची बहिण या दोघींनी गुंतवणूक केलेले १६ लाख ९० हजार १४२ रुपये तसेच पतसंस्थेची पुणे येथील घोले रोड, पिंपळे गुरव, आंबेगाव, निगडी व जामनेर येथील मालमत्ता कमी किंमतीत विकून त्यामध्ये ४८ कोटी ५६ लाख २५ हजार ८२० रुपयांचा अपहार तर १३ कोटी १७ लाख ७२ हजार २०१ रुपयांचा संशयास्पद व्यवहार असा एकूण ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, सूरज झंवर व इतर संशयितांचा तपास अजून सुरु असल्याने त्यांचे दोषारोप विहीत वेळेत सादर केले जाणार असल्याची माहिती नवटके यांनी दिली.

शासनाने बीएचआरवर प्रशासक म्हणून २०१५ मध्ये जितेंद्र कंडारे याची नेमणूक केली होती. त्याने अटक आरोपी व इतरांशी संगनमत करुन पतसंस्थेच्या मालमत्ता बनावट वेबसाईट तयार करुन सुनिल झंवर व त्यांच्या फर्मच्या नावे बेकायदेशीरित्या वर्ग करुन पूर्ण मोबदला न देता ठेवीदारांच्या पावत्या ३०टक्क्यांने विकत घेऊन त्यांच्या ७० टक्के रक्कमेचा व संस्थेच्यामालमत्तेचा अपहार केला.

मर्यादीत जणांनीच भरले टेंडर

दरम्यान, या आरोपींनी कृणाल शहा याच्याकडून खाजगी वेबसाईट तयार करुन त्यावर पुण्यातील निगडी, घोले रोड, पिंपळे गुरव, आंबेगाव खुर्द आणि जळगाव येथील पतसंस्थेच्या स्थावर मालमत्ता विक्रीची निविदा काढली. त्यात मर्यादित लोकांनी टेंडर भरुन या मालमत्ता केवळ ७ कोटी ७५ लाख ५४ हजार १२१ रुपयांना विकल्या. त्यामुळे पतसंस्थेचे ४८ कोटी ५६ लाख २५ हजार ८२० रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले.अवसायक जितेंद्र कंडारेने पतसंस्थेची कर्जवसुली करुन तसेच मालमत्ता विकून त्याचे सर्व ठेवीदारांचे देणे समान तत्वाचा वापर करुन वितरीत करणे अपेक्षित होते. मात्र, त्याने ठेवीदारांना केवळ ३० टक्के पैसे देऊन त्यांच्याकडून १०० टक्के पैसे मिळाल्याचे लिहून घेऊन कर्जदारांना फायदा करुन दिला.