शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

रावेर तालुक्यात ३० गावातील ४१७.४ हेक्टर केळी बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 7:34 PM

३ व १० जून रोजी झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्यात ३० गावातील ७०५ शेतकऱ्यांच्या ४१७.४ हेक्टर क्षेत्रातील ५१.४२ टक्के केळीबागा जमीनदोस्त झाली.

ठळक मुद्देपंचनाम्यांचा अंतिम अहवालवादळी पावसाचा फटका

रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील ३ व १० जून रोजी झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्यात ३० गावातील ७०५ शेतकऱ्यांच्या ४१७.४ हेक्टर क्षेत्रातील ५१.४२ टक्के केळीबागा जमीनदोस्त झाली. त्यात १६ कोटी ६९ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनाम्यांचा अंतिम अहवाल तहसीलदार उषाराणी देवगुणे, तालुका कृषी अधिकारी विजय महाजन व सहाय्यक गटविकास अधिकारी हबीब तडवी यांनी सादर केला आहे.निसर्ग वादळाच्या तडाख्याचे अंशत: पडसाद केºहाळे बुद्रूक, मंगरूळ, जुनोने, पाल व रावेर येथील १४ शेतकऱ्यांच्या १६.७६ हेक्टर पैकी ५.९२ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा बाधित होऊन २३ लाख ६८ हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करून अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे.दरम्यान, तालुक्यातील निंभोरा, विवरे खुर्द, वडगाव, चिनावव कुंभारखेडा परिसरात दि १० जून रोजी दुपारी वादळी पावसाने तडाखा दिला होता. किंबहुना, अवघ्या पाच सहा तासांनी ते शमलेले चक्रीवादळाने जोरदार पावसासह घोंघावत रात्री बोरखेडा, तामसवाडी, रावेर, पुनखेडा, पातोंडी परिसरासह दसनूर, विवरे बु।।, मोरगाव बु।।, मोरगाव खुर्द, अटवाडे, वाघोड, कर्जोद, भोकरी,खिरवड, थेरोळा, धुरखेडा, भाटखेडा, कोचूर परिसरातील २७ गावातील शेतीशिवारातील ८००.१४ हेक्टर पैकी ४११.४८ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा उन्मळून जमीनदोस्त झाल्याने ५१.४२ टक्के नुकसान होवून १६ कोटी ४५ लाख ९२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनामे करून आज अंतिम अहवाल सादर करण्यात आला असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दिली.सर्वाधिक नुकसानदरम्यान, निंभोरा बु।। येथील १८३ शेतकºयांचे १२१.२४ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा भुईसपाट होवून ४ कोटी ८४ लाख ९६ हजार रू चे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. विवरे खुर्द येथील १७० शेतकºयांचे ११९.०६ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा उन्मळून ४ कोटी ७६ लाख २४ हजारांचे नुकसान झाले आहे. रावेर शिवारातील १२५ शेतकºयांच्या ९६.२४ हेक्टर क्षेत्रात केळीबागा बाधित होवून ३ कोटी ८४ लाख ९६ हजारांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. वडगाव येथील ४३ हेक्टर क्षेत्रात केळी बाधित होऊन ९८ लाख ८० हजार रू चे नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.दरम्यान, इतर २३ गावातील शेतकºयांचे नुकसानीचे बाधित क्षेत्र १० हेक्टरच्या आत आहे. दोन्ही वादळी पावसाच्या तडाख्यात ४१७.४ हेक्टर केळीबागा बाधित होऊ १६ कोटी ६९ लाख ६० हजारांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहे. तद्वतच, १६ जून रोजी झालेल्या वादळी पावसातील नुकसानीचे पंचनामेही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दिली.

टॅग्स :fruitsफळेRaverरावेर