शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

Ganesh Chaturthi 2018 : जळगावात गणेशोत्सवात जगविली ३९ वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 12:42 IST

पर्यावरणपूरक उपक्रम

ठळक मुद्देभारती पर्यावरण प्रतिष्ठानच्यावतीने वृक्ष संवर्धनासह मेहरुण तलावाच्या स्वच्छतेसाठीही पुढाकारझाडांच्या संवर्धनासाठी पाठपुरावा

जळगाव : गणेशोत्सवात विविध उपक्रम राबविले जात असताना गेल्या तीन वर्षांपासून शहरातील भारती पर्यावरण प्रतिष्ठान ही संस्था पर्यावरण रक्षणासाठी धडपड करीत आहे. तीन वर्षात या संस्थेने गणेशोत्सावादरम्यान ३९ वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले आहे. इतकेच नव्हे तर मेहरुण तलावाच्या स्वच्छतेसाठी व पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपती मूर्तींच्या स्थापनेचा प्रचार प्रचास करीत आहे.गणेशोत्सव म्हटला म्हणजे या काळात वेगवेगळ््या संस्थांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याचाच एक म्हणून शहरातील भारती पर्यावरण प्रतिष्ठान ही संस्था गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचे काम करीत आहे. विशेष म्हणजे हे काम केवळ गणेशोत्सवापूरताच मर्यादीत न ठेवता यासाठी संस्था बाराही महिने अखंडपणे काम करीत असते. यामध्ये तीन वर्षात संस्थेने अनेक ठिकाणी वृक्ष लागवड तर केलीच आहे, सोबतच गणेशोत्सवात ३९ वृक्षांची केवळ लागवडच न करता त्यांचे जतन करण्याचे काम केले आहे.सर्व झाडे जगलीसंस्थेच्यावतीने रामानंद नगर घाटामध्ये १९, द्वारकानगरमध्ये ११ तसेच महाबळमधील पशू चिकित्सलायनजीक ९ अशी कडूनिंब, वड, पिंपळ, गुलमोहर अशी विविध जातीचे ३९ झाडे लावली आहेत. या ठिकाणी केवळ झाडे लावून ती सोडून दिली नाही तर वेळोवेळी त्या ठिकाणी जाऊन त्यांचे जतन करण्याचे काम केल्याने ही सर्व वृक्ष जगली आहे. द्वारकानगरात ११ वृक्षांची लागवड केल्यानंतर तेथील रहिवाशांनी प्रेरणा घेऊन आणखी १० वृक्ष तेथे लावली, हे विशेष.झाडांच्या संवर्धनासाठी पाठपुरावाकेवळ वृक्ष लावण्यावरच न थांबता लावलेल्या वृक्षांच्या परिसरात अथवा इतर कोठेही वृक्षांना खिळे ठोकून जाहिरात लावलेली असल्यास त्या बाबत संबंधितांना सूचना देऊन ते काढण्यास सांगतात. त्यांनी न ऐकल्यास संस्था स्वत: या जाहिराती काढून झाडावरील खिळे काढून टाकते. यासोबतच झाडांच्या वाढीस कोठे अडथळा येत असल्यास ते दूर करण्याचेही काम संस्था करीत असते. यामुळे गणेशोत्सवात या ३९ झाडांसह इतरही अनेक झाडांचे संवर्धन यामुळे शक्य झाल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.पर्यावरणास घातक मूर्तींचा वापर टाळाप्लॅस्टर आॅप पॅरिसच्या मूर्तींमुळे पर्यावरणास धोका असल्याने त्या टाळून शाडू मातीच्या मूर्ती स्थापन करण्याचे आवाहन संस्थेमार्फत केले जाते. त्यात तीन वर्षात बरेच यश आले असून त्यामुळे अनेक जण शाडू मातीच्या मूर्तींची स्थापना करूलागल्याचेसांगण्यातआले.‘मी मेहरुण तलाव बोलतोय...’वृक्ष लागवड, पर्यावरणपूरक मूर्तींच्या स्थापनेचा प्रचार करण्यासह गणेश विसर्जनादरम्यान मेहरुण तलावाची होणारी अस्वच्छता याकडेही संस्थेने सामान्यांसह मनपाचेही लक्ष वेधले आहे. यासाठी संस्थेने ‘मी मेहरुण तलाव बोलतोय...’ अशी चित्रफित तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. याद्वारे तलावाची कशी अवस्था होत आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला असून त्याबाबत जागृत होण्याचा संदेश दिला जात आहे. ही चित्रफित मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनाही पाठविण्यात आली असून तलावाच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी संस्थेने केली आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड, पर्यावरणास घात ठरणाऱ्या मूर्तींचा वापर न करणे तसेच शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावाच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे असून त्यासाठी संस्था तीन वर्षांपासून काम करीत आहे. यासाठी तरुण वर्गाने पुढे येणे गरजेचे आहे.- सुजाता देशपांडे, अध्यक्षा, भारती पर्यावरण प्रतिष्ठान.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Jalgaonजळगाव