शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

Ganesh Chaturthi 2018 : जळगावात गणेशोत्सवात जगविली ३९ वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 12:42 IST

पर्यावरणपूरक उपक्रम

ठळक मुद्देभारती पर्यावरण प्रतिष्ठानच्यावतीने वृक्ष संवर्धनासह मेहरुण तलावाच्या स्वच्छतेसाठीही पुढाकारझाडांच्या संवर्धनासाठी पाठपुरावा

जळगाव : गणेशोत्सवात विविध उपक्रम राबविले जात असताना गेल्या तीन वर्षांपासून शहरातील भारती पर्यावरण प्रतिष्ठान ही संस्था पर्यावरण रक्षणासाठी धडपड करीत आहे. तीन वर्षात या संस्थेने गणेशोत्सावादरम्यान ३९ वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले आहे. इतकेच नव्हे तर मेहरुण तलावाच्या स्वच्छतेसाठी व पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपती मूर्तींच्या स्थापनेचा प्रचार प्रचास करीत आहे.गणेशोत्सव म्हटला म्हणजे या काळात वेगवेगळ््या संस्थांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याचाच एक म्हणून शहरातील भारती पर्यावरण प्रतिष्ठान ही संस्था गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचे काम करीत आहे. विशेष म्हणजे हे काम केवळ गणेशोत्सवापूरताच मर्यादीत न ठेवता यासाठी संस्था बाराही महिने अखंडपणे काम करीत असते. यामध्ये तीन वर्षात संस्थेने अनेक ठिकाणी वृक्ष लागवड तर केलीच आहे, सोबतच गणेशोत्सवात ३९ वृक्षांची केवळ लागवडच न करता त्यांचे जतन करण्याचे काम केले आहे.सर्व झाडे जगलीसंस्थेच्यावतीने रामानंद नगर घाटामध्ये १९, द्वारकानगरमध्ये ११ तसेच महाबळमधील पशू चिकित्सलायनजीक ९ अशी कडूनिंब, वड, पिंपळ, गुलमोहर अशी विविध जातीचे ३९ झाडे लावली आहेत. या ठिकाणी केवळ झाडे लावून ती सोडून दिली नाही तर वेळोवेळी त्या ठिकाणी जाऊन त्यांचे जतन करण्याचे काम केल्याने ही सर्व वृक्ष जगली आहे. द्वारकानगरात ११ वृक्षांची लागवड केल्यानंतर तेथील रहिवाशांनी प्रेरणा घेऊन आणखी १० वृक्ष तेथे लावली, हे विशेष.झाडांच्या संवर्धनासाठी पाठपुरावाकेवळ वृक्ष लावण्यावरच न थांबता लावलेल्या वृक्षांच्या परिसरात अथवा इतर कोठेही वृक्षांना खिळे ठोकून जाहिरात लावलेली असल्यास त्या बाबत संबंधितांना सूचना देऊन ते काढण्यास सांगतात. त्यांनी न ऐकल्यास संस्था स्वत: या जाहिराती काढून झाडावरील खिळे काढून टाकते. यासोबतच झाडांच्या वाढीस कोठे अडथळा येत असल्यास ते दूर करण्याचेही काम संस्था करीत असते. यामुळे गणेशोत्सवात या ३९ झाडांसह इतरही अनेक झाडांचे संवर्धन यामुळे शक्य झाल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.पर्यावरणास घातक मूर्तींचा वापर टाळाप्लॅस्टर आॅप पॅरिसच्या मूर्तींमुळे पर्यावरणास धोका असल्याने त्या टाळून शाडू मातीच्या मूर्ती स्थापन करण्याचे आवाहन संस्थेमार्फत केले जाते. त्यात तीन वर्षात बरेच यश आले असून त्यामुळे अनेक जण शाडू मातीच्या मूर्तींची स्थापना करूलागल्याचेसांगण्यातआले.‘मी मेहरुण तलाव बोलतोय...’वृक्ष लागवड, पर्यावरणपूरक मूर्तींच्या स्थापनेचा प्रचार करण्यासह गणेश विसर्जनादरम्यान मेहरुण तलावाची होणारी अस्वच्छता याकडेही संस्थेने सामान्यांसह मनपाचेही लक्ष वेधले आहे. यासाठी संस्थेने ‘मी मेहरुण तलाव बोलतोय...’ अशी चित्रफित तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. याद्वारे तलावाची कशी अवस्था होत आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला असून त्याबाबत जागृत होण्याचा संदेश दिला जात आहे. ही चित्रफित मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनाही पाठविण्यात आली असून तलावाच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी संस्थेने केली आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड, पर्यावरणास घात ठरणाऱ्या मूर्तींचा वापर न करणे तसेच शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावाच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे असून त्यासाठी संस्था तीन वर्षांपासून काम करीत आहे. यासाठी तरुण वर्गाने पुढे येणे गरजेचे आहे.- सुजाता देशपांडे, अध्यक्षा, भारती पर्यावरण प्रतिष्ठान.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Jalgaonजळगाव