शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

विजेची तार तुटून पडल्याने येथील ३२ शेळ्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 9:53 PM

बंदिस्त असलेल्या ३२ शेळ्यांवर मुख्य विजेची तार तुटून पडल्याने त्या पशुधनाचा तडफडून मृत्यू होऊन लाखोंचे नुकसान झाले.

ठळक मुद्देबांबरुड येथील घटना, शेतकरी संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क

कुरंगी, ता. पाचोरा : येथून जवळच असलेल्या बाबरूड राणीचे येथील गाव शिवारातील एका भिल्ल समाजाचा ज्येष्ठ नागरिकाच्या बंदिस्त असलेल्या ३२ शेळ्यांवर मुख्य विजेची तार तुटून पडल्याने त्या पशुधनाचा तडफडून मृत्यू होऊन लाखोंचे नुकसान झाले.

घटनास्थळी महावितरण, पोलीस व पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते तर ‘महसूल’चे अधिकारी अनुपस्थित होते. दि. १२ एप्रिलला सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बांबरुड राणीचे येथील राजाराम सखाराम भिल्ल (६८) यांच्या मालकीच्या १० बोकड, २२ शेळ्या अशा एकूण ३२ शेळ्या भूमिहिन असलेले राजाराम भिल हे संसाराचा गाडा हाकत होते. जुन्ने शिवारात व वनविभागाला लागून शेतावर बसवलेल्या असताना सोमवारी सकाळी सातच्या सुमारास मुख्य विजेची लाईनवरील क्लँम तुटल्यामुळे विजेचा तार खाली पडल्यामुळे शेतातील ३२ बकरी जागेवरच तडफडून मरण पावल्या.

मोठी घटना टळली

राजाराम भिल्ल हे ज्या ठिकाणी राहत होते, त्या ठिकाणी झोपडीत रात्री वन्यप्राण्यांच्या बचावासाठी त्या शेळ्यांना कोंडून ठेवत होते व दररोज सकाळी झोपडी शेजारी तारेचे वाॅल कंपाैंड केलेले होते, त्याठिकाणी त्या शेळ्यांना ठेवत होते. दररोजच्या नियमानुसार शेळ्या तार कंपाैंडमध्ये टाकल्यानंतर व राजाराम भिल्ल हे झोपडीतील साफसफाई करून सकाळचा चहा करत असतानाच मोठा किंचाळण्याचा आवाज आल्याने त्यांनी बाहेर बघितले तर ३२ शेळ्या यांच्या अंगावर विजेची तार पडून त्या तडफडत मृत्यू पावत होते तर तेथेच एका निंबाच्या झाडाखाली एक दुधाळ गाय, वासरू बाधलेले होते.

तुटलेली विजेची तार त्या निंबावर पडल्याने गाय, वासरू व राजाराम भिल्ल हे बालंबाल बचावले. घटनास्थळी ‘महावितरण’चे लासलगाव उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता दीपक बानबाकूडे, लाईनमन अनिल मिस्तरी, वासुदेव पाटील, प्रेमचंद राठोड, अकिल मेवाती यांनी पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश बारी, युवराज चौधरी यांनी जागेवर मृत झालेल्या पशुधनाचे शवविच्छेदन केले.

पोलीस प्रशासनाचे सहाय्यक फौजदार रामदास चौधरी, चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. एवढी मोठी घटना घडली असताना महसूल विभागाची अनुपस्थिती दिसून आली. मृत झालेल्या शेळ्यांची आजच्या बाजारभावानुसार ४.५० लाखांचे नुकसान झाले असून ते त्वरित मिळावे, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :JalgaonजळगावPachoraपाचोराFarmerशेतकरी