शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामांतरासाठी २५ वर्षांचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:28 PM

बहिणाबार्इंच्या नावासाठी मोर्चा, पदयात्रा, उपोषण

ठळक मुद्देबहिणाबाई उद्यान ते विद्यापीठापर्यंत पदयात्राकुलगुरुंना निवेदन

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २३ - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रस्ताव मांडण्यासह मोर्चे, पदयात्रा, उपोषण असे आंदोलन करीत मोठा लढा जळगाव जिल्ह्यात देण्यात आला व अखेर विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव मिळाल्याने या लढ्याला यश आल्याचा आनंद असल्याचे जिल्हावासीयांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या मागणीसाठी सर्वच संघटना, सामाजिक, शैक्षणिक पातळीवरून यासाठी पाठपुरावा करण्यात आला.विविध संघटना आल्या एकत्रया मागणीसाठी जळगाव येथे बहिणाबाई स्मारक समिती, लेवा पाटीदार महासंंघ, छावा संघटना, मराठा महासंघ, बंजारा क्रांती इत्यादी संघटनांनी एकत्र येत जळगावात मोर्चा काढला व विद्यापीठास बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची मागणी लावून धरली.बहिणाबाई उद्यान ते विद्यापीठापर्यंत पदयात्राराष्ट्रवादी काँग्रेसकडूनही २०११पासून यासाठी लढा सुरू आहे. २०१२मध्ये या मागणीसाठी बहिणाबाई उद्यान ते विद्यापीठापर्यंत पदयात्रा काढण्यात आली होती. या सोबतच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देण्यासह जिल्ह्यात येणाऱ्या नेत्यास निवेदन देण्यात आले. गणेशोत्सवादरम्यानही प्रत्येक मंडळाजवळ मागणीचे फलक लावण्यात येऊन आपला लढा चालूच ठेवला. या मागणीसाठी २० संघटनांसह प्रत्येक पक्षाचे आमदार, जिल्हाध्यक्षांनी पाठिंबा दिला होता.शिवजयंती सोहळ््यातही मागणीसाधारण १६ ते १७ वर्षांपूर्वी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवासंघ, सरदार ब्रिगेड यांनी शिवजयंती सोहळ््यादरम्यान ही मागणी केली व नंतर त्यासाठी पाठपुरावा करण्यात आला.कुलगुरुंना निवेदन१९९८मध्ये विद्यापीठस्तरीय विद्यार्थी परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष मनोज दयाराम चौधरी यांनी तत्कालीन कुलगुरु एस.एफ. पाटील यांना निवेदन देऊन ही मागणी केली व शासनस्तरावरही पाठपुरावा केला होता.मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडतर्फे १९ फेब्रुवारी १९९७ रोजी बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.स्मारकाचेही काम मार्गी लागावेबहिणाबाई चौधरी यांचे माहेर असलेल्या असोदा येथे बहिणाबाईंचे स्मारक उभारले जात आहे, मात्र सध्या ते थंड बस्त्यात असल्याने हे कामही मार्गी लागावे, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. २०११पासून या स्मारकाच्या कामाला सुरूवात झाली खरी, मात्र केवळ ४० टक्केच काम झाल्याने काहीशी नाराजी आहे. गेल्या तीन वर्षांपासून तर यासाठी एक रुपयाचाही निधी मिळाला नसल्याने काम खोळंबले आहे.वाड्याचाही विकास व्हावाजळगावात बहिणाबाई यांचे वास्तव्य राहिलेला वाडादेखील असून या वाड्यात त्यांच्या वापराच्या वस्तू आहे. या वाड्याचेही जतन केले जावे, अशी मागणीदेखील पुढे आली आहे.१९९४मध्येही मागणीविद्यापीठ स्थापनेच्या चारच वर्षानंतर विष्णू भंगाळे, महेश ढाके यांनी ही मागणी केली होती.बºयाच वर्षापासूनची सर्वांचीच ही मागणी होती. यासाठी सर्वच समाजाचे मंडळी पुढे आले. आपल्या सर्वांच्या लढ्याला आज न्याय मिळाल्याने मोठा आनंद आहे. सरकारचे या बद्दल आभार.- विष्णू भंगाळे, सिनेट सदस्य.आमच्या लढ्याला अखेर यश आले असून विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव मिळाल्याचा मोठा आनंद आहे.- विनोद देशमुख.खान्देशकन्येच्या नावाने आता विद्यापीठ ओळखले जाणार असल्याने याचा असोदेकर मंडळींसाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे.- किशोर चौधरी, असोदा.बहिणाबाई चौधरी यांचा उर्जास्त्रोत नवीन पिढीलाही मिळावा, यासाठी आपला प्रयत्न होता. त्यास यश आल्याचा आनंद आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथराव खडसे यांचे आभार.- मुविकोराज कोल्हे.या लढ्यात सर्वांनी पुढाकार घेत एकमुखी मागणी केल्याने हे सर्वांचे यश म्हणावे लागेल.- मनोज दयाराम चौधरी, संस्थापक अध्यक्ष सरदार ब्रिगेड.

टॅग्स :Jalgaonजळगावuniversityविद्यापीठ