शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेला २४५ विद्यार्थी बसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:21 IST

जळगाव : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा १६ सप्टेंबर, तर दहावीची पुरवणी ...

जळगाव : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा १६ सप्टेंबर, तर दहावीची पुरवणी परीक्षा ही २१ सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. दरम्यान, या परीक्षा कालावधीत विद्यार्थी अभ्यासाचा ताण आणि परीक्षेच्या भीतीमुळे दडपणाखाली येऊन नकारात्मक विचार करतात व कधी- कधी टोकाची भूमिका घेतात, अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व निकोप वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, म्हणून नाशिक विभागीय मंडळांकडून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण यांनी दिली.

इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी, तसेच एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होणार आहेत. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा घेतली जाणार असून, दहावीची लेखी परीक्षा २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होईल. बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत होईल. इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान होईल. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या ताणतणावविषयक समस्यांचे व शंकांचे निरसन करण्यासाठी व अनिष्ट घटना टाळण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही सुविधा १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी असेल.

...असे आहेत समुपदेशक

नाशिक जिल्ह्यासाठी किरण बावा, धुळे जिल्ह्यासाठी नंदकिशोर उद्धवराव बागूल, जळगाव जिल्ह्यासाठी बापू माधव साळुंखे यांची, तर नंदुरबार जिल्ह्यासाठी राजेंद्र माळी यांची समुपदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुरवणी परीक्षेसाठी भरारी पथकांचीसुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे.

परीक्षार्थी संख्या अशी...

बारावीची पुरवणी परीक्षा ही जिल्ह्यातील आठ केंद्रांवर होणार आहे. त्यात हाजी नूर म. चाचा ज्यु. महाविद्यालय (जळगाव), पी.ओ. नाहाटा महाविद्यालय (भुसावळ), कोतकर महाविद्यालय (चाळीसगाव), धनाजी नाना महाविद्यालय (एरंडोल), शेठ मु.मा. कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय (पाचोरा), कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय (चोपडा), किसान महाविद्यालय (पारोळा) या केंद्रांचा समावेश आहे. १४३ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहे, तसेच दहावीची पुरवणी परीक्षा ही तेरा केंद्रांवर होईल, तर १०२ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत.