शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
18
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
19
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
20
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!

२२०० शाळांमध्ये शिजणार सुट्टीतही खिचडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 17:14 IST

शिक्षण विभागाने जारी केले निर्देश; शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर तर कारवाईचेही संकेत

ठळक मुद्दे शिक्षकांमध्ये मात्र सुट्टीतही शाळेत यावे लागणार असल्याने नाराजीचा सुर आहे.२६ जिल्ह्यातील ४० हजार २८८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सरसकट शाळांमध्ये ही योजना लागू करु नये. असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे.

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यात बहुतांशी भागात दुष्काळाने वेढा दिल्याने मे महिन्याच्या सुट्यांमध्ये शाळेत खिचडी शिजविण्याचे निर्देश शिक्षण विभागाने जारी केले आहेत. जिल्ह्यातील २२०० शाळांमध्ये खिचडी शिजवली जाणार असून मुख्याध्यापकांना नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षकांमध्ये मात्र सुट्टीतही शाळेत यावे लागणार असल्याने नाराजीचा सुर आहे.

राज्यात यंदा भयावह दुष्काळाचे सावट आहे. २६ जिल्ह्यातील ४० हजार २८८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील २२०० शाळांमध्ये मुलांना मे महिन्याच्या सुट्टीत शिजवून पोषण आहार देण्याचे नियोजन आहे. याबाबत राज्य शासनाने परिपत्रक जारी केले आहे. 

चार तारखेपासून प्राथमिक शाळांना उन्हाळी सुट्टी लागत आहे. सुट्या १६ जून अखेर असतील. सुट्टीच्या कालावधीतही  मुलांना पोषण आहार दिला जाणार आहे. शासनाचा उद्देश चांगला असला तरी, मे महिन्यात मुले शाळेत येत नाही. पालकांना समज देऊनही ते मुले शाळेत पाठवित नाहीत. त्यामुळे योजनेला हरताळ फासण्याची शक्यताच अधिक आहे. पोषण आहार शिजवून तो वाया गेल्यास याला जबाबदार कोण ? असाही प्रश्नही उपस्थित होत आहे. ज्या भागात मुलांना दुष्काळात अन्न उपलब्ध होत नाही. तिथेच पोषण आहार देणे योग्य होईल. सरसकट शाळांमध्ये ही योजना लागू करु नये. असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे.

तीन तास थांबावे लागणार

पोषण आहार शिजवण्यासह वाटपाचे नियोजन मुख्याध्यापकांना करावे लागणार आहे. यासाठी उपशिक्षकांना कामे देण्यात यावी. महिनावर नियोजनात प्रत्येक दिवशी शिक्षकांची ड्युटी असेल. संबंधित शिक्षकाने शाळेत  सकाळी सात वाजता उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार बचत गटांकडून पोषण आहार शिजवायचा आहे. सकाळी ९ ते १० यावेळात पोषण आहाराचे वाटप करावयाचे आहे. 

हलगर्जीपणा केल्यास कारवाई

सुट्टीमध्ये पोषण आहार शिजवण्यासह मुलांना वाटप करण्यात हलगर्जीपणा झालास शिक्षकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी भरारी पथकेही नेमली गेली आहेत. दुष्काळात पोषण आहारापासून मुले वंचित राहू नये. यासाठी ही योजना आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांना कार्यवाहीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. - बी.जे.पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद, जळगाव.

 

टॅग्स :SchoolशाळाJalgaonजळगावChalisgaonचाळीसगावEducationशिक्षण