शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
5
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
6
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
7
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
8
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
9
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
11
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
12
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
13
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
14
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
15
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
16
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
17
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
18
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
19
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

जिद्द असणाऱ्या युवकांनी नवनिर्माण घडवावे : राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:56 AM

महाराष्ट्र, मराठवाड्याच्या विकासासाठी काही तरी नवीन करून दाखविण्याची जिद्द असणा-या युवकांनी विकासाचे मुद्दे घेऊन आपल्या सोबत आल्यास त्यांना आपण पदाच्या माध्यमातून संधी देऊ, निवडणुका या गमतीचा विषय नसून, यावेळी जागृत राहून योग्य त्यांना मतदान केल्यासच महाराष्ट्राचा विकास होऊ शकेल असे प्रतिपादन नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाराष्ट्र, मराठवाड्याच्या विकासासाठी काही तरी नवीन करून दाखविण्याची जिद्द असणा-या युवकांनी विकासाचे मुद्दे घेऊन आपल्या सोबत आल्यास त्यांना आपण पदाच्या माध्यमातून संधी देऊ, निवडणुका या गमतीचा विषय नसून, यावेळी जागृत राहून योग्य त्यांना मतदान केल्यासच महाराष्ट्राचा विकास होऊ शकेल असे प्रतिपादन नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी केले.रविवारी त्यांच्या उपस्थितीत येथील गुरूगणेश भवनमध्ये कार्यकर्त्याच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांना स्पर्श केल. आजपर्यंत आपण केवळ चुकीच्या मुद्यांभोवती फिरत राहिलो. निवडणुका आल्यावर पैसा, जेवण आणि दारू एवढे मिळाले म्हणजे युवकांनी ती मोज-मजा वाटते. परंतु ही चुकीची धारण बाजूला ठेवा, समाजाच्या राज्याच्या आणि विशेष करून मराठवाड्याच्या विकासासाठी नेमके काय केले पाहिजे हे आधी ठरवा. ते ठरवून हे करणे गरजेचे आहे, याच संदेश मला पाठवा, योग्य त्या प्रस्तावांची आपण जरूर दखल घेऊन त्यानुसार संबंधिताला संधी देऊ असे सांगून ठाकरे म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्यावरून सरकार राजकारण करत आहे. आरक्षण केवळ शिक्षण आणि नोकरी या दोनच ठिकाणी मिळते. येथे किती कमी संधी आहेत हे आपण जाणून आहात. मात्र त्याची वस्तुनिष्ठ माहिती दिली जात नसल्याने युवकांची दिशाभूल केली जात असल्याचे ते म्हणाले.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके, गजानन गीते, खटके आदींसह पानसरे, रमेश पाटील आदींची उपस्थिती होती.मेळाव्यास जिल्हाभरातून नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने हजर होते.निवडणुका आल्या की, राम मंदिरनिवडणुका आल्या की, भाजपला राम मंदिराचा मुद्दा आठवतो. गेली चार वर्षे बहुमताची सत्ता असताना ते का केले नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. तसेच हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करून दंगल घडवायची आणि त्याचा लाभ मतपेटीसाठी करून घ्यायचा ही भाजपाची रणनिती असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे