शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

‘गझल’चा वारसा तरूण पिढी समर्थपणे जपतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:33 AM

तरूण पिढी ताकदीचे गझल लेखन करून गझल वारसा समर्थपणे जपत आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध गझलकार दास पाटील यांनी मंगळवारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कवी सुरेश भटानंतर शिथिलता आलेल्या ‘गझल’ची सोशल मीडियामुळे व्यापकता वाढली असून, तरूण पिढी ताकदीचे गझल लेखन करून गझल वारसा समर्थपणे जपत आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध गझलकार दास पाटील यांनी मंगळवारी केले.मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मंगळवारी भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा जालना आणि जेईएस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गझल कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ‘ते’ बोलत होते.यावेळी उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. जवाहर काबरा हे उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राव साहेब ढवळे, प्रसिद्ध गझलकार मसूद पटेल, चित्रपट कथा लेखक चेतन सैंदाने, डॉ. राज रणधीर, डॉ. पंडित रानोमाळ, डॉ. के. जी. सोनकांबळे आदींची उपस्थिती होती.पाटील म्हणाले, गझल, काव्यातून क्रांती घडवून आणली जाते, हे इतिहास दर्शवितो. गझल ही आपल्या जीवनाशी निगडित असते. गझलमुळे जीवन व्यापक होते. व्याकरण आणि तंत्र सांभाळून गझल लेखन करायला पाहिजे, शिवाय गझल लेखन करताना आशय, अचूकता व प्रभावीरीत्या विषयाची मांडणी करणे गरजेचे आहे. सोशल मीडियामुळे गझल लोकप्रिय होत आहे. नवीन पिढीतील गझलकार ताकदीचे गझल लेखन करताना दिसत आहेत. इंद्रजित उगले, अजय त्रिभुवन, सुरेश यलगुडे, सांबरे आदी गझलकार ताकदीचे गझल लेखन करीत आहेत.गझलकार मसूद पटेल यांनी गझल ही अर्थपूर्ण आणि प्रभावी असावी, असे सांगून गझलचा वारसा समर्थपणे जपण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे, असे आवाहन केले.प्रारंभी प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांच्या हस्ते वृक्ष जलदान करून या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. संशोधन परिषद शाखेचे सचिव डॉ. पंडित रानमाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

टॅग्स :literatureसाहित्यSocial Mediaसोशल मीडिया