शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अपघातात तरुण ठार; एक जण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:28 IST

विरेगाव जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवरील नीलेश पंडितराव नरवडे (३० रा. पिंपळगाव रेणुकाई ता. भोकरदन) हा तरुण जागीच ठार झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन -जाफराबाद मार्गावरील विरेगाव जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवरील नीलेश पंडितराव नरवडे (३० रा. पिंपळगाव रेणुकाई ता. भोकरदन) हा तरुण जागीच ठार झाला.तर या अपघातात दीपक छगनराव देशमुख (३३ रा. पिंपळगाव रेणुकाई) हा गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी दुपारी २ वाजेच्या दरम्यान नीलेश नरवडे व दीपक देशमुख हे दोघे दुचाकी क्रमांक एम एच २८ ए. डब्लू ५४३४ या गाडीवर भोकरदनकडून पिंपळगाव रेणुकाई या आपल्या गावाकडे जात असताना विरेगाव जवळच्या पुलाजवळ जाफराबाद कडून भोकरदन कडे येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराने धडक दिली. नीलेश जागीच ठार झाला.दीपक गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर भोकरदन ग्रामीण रुग्णालयात डॉ कल्याणी बडवे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद ला हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी गणेश पायघन, सूर्यवंशी, गणेश गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. भोकरदन पोलीस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या अपघातात मयत झालेला नीलेश नरवडे हा पिंपळगाव रेणुकाई येथील उपसरपंच पंडितराव नरवडे यांचा मुलगा आहे.गेल्या काही महिन्यांपासून भोकरदन तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढल्याने चिंतेचा विषय बनला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू