शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 17:42 IST

मराठा समाज संख्येने ५०-५५ टक्के आहे, त्यांना १० टक्के आरक्षण कसे पुरेसे होईल?"

वडीगोद्री (जालना): "तुम्ही जीआरमध्ये फेरफार करा, शब्द प्रयोग बदला आणि मग बघा तुम्हाला मराठे कळतील आणि आंदोलनही कळेल," असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर केला आहे. वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या वक्तव्यावर जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते शनिवारी अंकुशनगर येथील निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.

जरांगे पाटील यांनी वडेट्टीवार यांना थेट प्रश्न विचारला. ते म्हणाले, "छातीवर हात ठेवून बोला, तुम्ही हैदराबाद गॅझेटच्या जीआरवर समाधानी आहात का? तुम्हाला तरी ओबीसींचा नेता म्हणून ते (भुजबळ) धरतात का? आम्ही तुम्हाला काही शब्दाने दुखावले आहे का? तुमचा ओबीसींचा नेता होण्याचा किती अट्टहास आहे? आमची तर इच्छा आहे की, तुमच्यासारखा हुशार नेता ओबीसींचा नेता व्हावा, पण ते तुम्हाला होऊ देतात का?" भुजबळांवर टीका करताना जरांगे म्हणाले, "वडेट्टीवार यांनी भुजबळांची बाजू ओढू नये. ते इतके पारदर्शक नेते नाहीत. तुमची प्रतिमा चांगली आहे, ती त्यांच्यामुळे उगाच मलीन कशाला करता?"

तुम्ही दंगली घडवून आणाल का?जरांगे यांनी भुजबळांवर गंभीर आरोप करत म्हटले की, "तुमच्या एका वक्तव्यानंतर मराठा नेते काहीसे शांत झाले आहेत. पण शांतता म्हणजे अराजकता नाही. तुमचा एक शब्द होता, ‘अराजकता माजेल’. तुम्ही अराजकता माजवाल म्हणजे दंगली घडवून आणाल का? आम्हाला माहीत आहे तुम्ही किती शहाणे आहात. तुमच्याच लोकांनी दंगली घडवून आणल्या आहेत."

माणूस म्हणून सरपंच देखील होऊ शकत नाहीभुजबळ यांचा 'ओबीसी-मराठा संघर्ष शांत झाला पाहिजे' या वक्तव्यावर जरांगे यांनी म्हटले की, "ते संघर्ष शांत होऊ देतील का? कारण, त्याच्याशिवाय त्यांची राजकीय पोळी भाजत नाही. ते कोणत्याही पक्षातून आमदार होतात, मंत्री होतात, ते फक्त ओबीसीचं नाव सांगून. माणूस म्हणून ते सरपंच सुद्धा होऊ शकत नाही इतकी त्यांची नियत खराब आहे."

ओबोसी आरक्षण आमच्या हक्काचेजरांगे यांनी यावेळी मराठा समाजाला दोन-तीन आरक्षणे असल्याच्या आरोपावरही उत्तर दिले. "आम्ही आधीच ओबीसीतून सरसकट आरक्षणाची मागणी करत आहोत, मग हा मुद्दा कसा येतो? मराठा समाज संख्येने ५०-५५ टक्के आहे, त्यांना १० टक्के आरक्षण कसे पुरेसे होईल?" असा सवाल त्यांनी केला. शिवाय आम्ही वारंवार सांगत आहोत की, ५० टक्क्यांच्यावर गेलेले आरक्षण टिकत नाही. देणारे तेच आहेत आणि घेणारे तेच आहेत,  सगळे सरकारचेच लोक आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण हे आमच्या हक्काच आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालनाChhagan Bhujbalछगन भुजबळVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार