शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

'हाताला काम द्या'; जालन्यात मजुरांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 16:28 IST

गरिकांचे स्थलांतर थांबावे यासाठी राज्य शासनाने रोसयोच्या माध्यमातून कामे देण्यात येत आहे. असे

जालना : जिल्ह्यातील दुष्काळाने ग्रामीण भागातील जनजजीवन विस्कळीत झाले आहे. शेतमजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने स्थलांतर वाढले आहे. नागरिकांचे स्थलांतर थांबावे यासाठी राज्य शासनाने रोसयोच्या माध्यमातून कामे देण्यात येत आहे. असे असतांनाही नागरिकांना काम मिळत नाही. हाताला काम देण्यात यावे, या मागणीसाठी परतूर, मंठा तालुक्यातील मजुरांनी सोमवारपासून आंदोलन सुरु केले होते. आज दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरु आहे.

सोमवारपासून परतूर, मंठा तसेच अन्य तालुक्यातील संतप्त मजुरांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईने हैराण असलेल्या शेतमजूरांना गावातच काम उपलब्ध करून देण्या संदर्भातील नियोजन हे प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री असल्याचे वास्तव या कामगारांच्या धरणे आंदोलनाने पुढे आले आहे. एकीकडे प्रशासनाकडे या संदर्भात संपर्क केला असता, ते म्हणाले की, आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला सेल्फवरील कामांचे नियोजन करण्याचे सूचना दिल्या आहेत. मात्र एकीकडे जी कामे केली सुरू आहेत, ती कामे जेसीबीने उरकन्यावर कंत्राटदारांचा भर असल्याचा आरोप मजूरांनी केला. त्यामुळे कोण खरे आणि कोण खोटे याची चौकशी होणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार योजनेतील अनेक कामे ही जिल्हाधिकाऱ्यांनी मजूरांसाठी दिल्यास त्यांना हक्काचा रोजगार मिळू शकेल. मात्र तसे होतांना दिसत नाही. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास माव पाटोदा, लिखीत पिंप्री येथे जेसीबीने कामे करण्यार भर दिला जात आहे.मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिले निवेदनदुसरीकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिलेल्या निवेदनात शेतकरी मजूर युनियन आणि लालबावटाच्या पदाधिका-यांनी म्हटले आहे की, परतूर, मंठा आणि घनसावंगी तालुक्यांतील मजुरांना मनरेगातून कामे द्यावीत, कामाची मागणी करूनही कामे न मिळाल्यास मजुरांना बेरोजगारी भत्ता द्यावा, प्रत्येक गावात दोन कोटी रुपयांच्या सेल्फची कामे मंजूर करावीत, परतूर तालुक्यातील आंबा येथील गाळ काढण्याच्या कामात ग्रामसेवकाची चौकशी करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.

पहा व्हिडीओ :

टॅग्स :agitationआंदोलनJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाdroughtदुष्काळ