शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

प्लास्टिक बंदीचे महिलांकडूनही स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 1:07 AM

या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असलो तरी ही अंमलबजावणी केवळ नव्याचे नऊ दिवस अशी राहू नये अशाही प्रतिक्रिया महिलांनी प्लास्टिक बंदीवर बोलताना व्यक्त केल्या.तर काहींनी दंड आकारणी चुकीचे असल्याचेही मत प्रदर्शित केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्लास्टिक बंदीचा राज्य सरकारचा निर्णय पर्यावरण रक्षणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आज या नवीन निर्णयामुळे अडचण जाणवत असली तरी, हळूहळू ती सवय आपल्याला लागेल यात शंका नाही. पूर्वीप्रमाणे बाजारात खरेदीसाठी जाताना घरून पिशवी नेण्याची पध्दत पुन्हा रूढ होणार आहे. प्लास्टिकचे विघटन लवकर होत नसल्याने आणि त्याचा अतिवापर झाल्याने एकूणच पर्यावरणाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असलो तरी ही अंमलबजावणी केवळ नव्याचे नऊ दिवस अशी राहू नये अशाही प्रतिक्रिया महिलांनी प्लास्टिक बंदीवर बोलताना व्यक्त केल्या.तर काहींनी दंड आकारणी चुकीचे असल्याचेही मत प्रदर्शित केले.सरकारने हा योग्य निर्णय घेतला आहे. प्रदूषणासाठी प्लास्टिक हे प्रमुख कारण असल्यामुळे त्यावर बंदी यायलाच हवी. कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक दिसून येते. जनावरे अन्नाच्या शोधात त्या कच-यातील प्लास्टिकही खातात. त्यामुळे त्यांना आजार होऊन ब-याचवेळा त्यांचा जीवही दगावतो. प्लास्टिककडे लोक फक्त सुविधा म्हणून बघतात. पण त्यामागील पर्यावरणातील प्रत्येक घटकावर होणाºया परिणामाकडे कोणीच लक्ष देत नाही.-मंगल जानराव साटोटेप्लास्टिक बंदीचा निर्णय सरकारने योग्यच घेतला आहे, परंतु त्यावर असलेला दंड हा सर्वसामान्य व्यक्ती भरू शकेल का, हा प्रश्नच आहे. कारण काही वयस्कर व्यक्तीच्या हातात प्लास्टिक बॅग दिसून आली व नियमानुसार त्यावर कारवाई झाली पण, त्याची आर्थिक स्थिती दंड भरण्याची नसेल यावेळेस सरकार काय निर्णय घेईल हा प्रश्नच आहे. - आशा सुहास पालकरप्लास्टिक बंदी लागू ही चांगली बाब आहे, परंतु पर्यावरणासाठी आणि माणसांसाठी प्लास्टिक कशाप्रकारे हानीकारक आहे हे इतरांना सांगण्याची गरज आहे, त्याचा जोमाने प्रचार-प्रसार केला पाहिजे.- अनुराधा हेरक र

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीWomenमहिला