शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

हिवाळ््यातच जालना जिल्ह्याची टँकरवर मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:36 IST

जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातच ४१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा पाऊस न पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत झपाट्याने घट होत असून, या वर्षी जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यातच ३.४७ मीटरने भूजल पातळीत घट झाली आहे. तर जिल्हाभरातील ८७ पैकी ३१ बोअरवेल नोव्हेंबर महिन्यातच कोरडेठाक पडले आहे. या सर्व परिस्थितीमुळे जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातच ४१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात ही परिस्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याची गरज आहे.यावर्षी पावसाळ््याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात वरुणराजा बरसला. परंतु, त्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्याने शेतक-यांनी लागवड केलेली पिके करपून केली. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच सध्या भूजल पातळीत घट झाल्यामुळे जिल्हाभरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच जिल्ह्यातील ३७ बोअरवेल कोरडेठाक पडले आहे. परिणामी, जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातच ४१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येणा-या काळात जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्तक राहण्याची गरज आहे.जाफराबाद, भोकरदन तालुक्यात सर्वाधिक टँकरजालना जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये ४१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यात भोकरदन तालुक्यातील १८ गावांमध्ये सवार्धिक २४ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर जाफराबाद तालुक्यातील ११ गावांमध्ये १४ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर बदनापुर तालुक्यात १, अंबड तालुक्यात १ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर जालना, मंठा, परतूर घनसावंगी तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत नाही.भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ११० विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. या सर्वच विहिंरीमधील भूजल पातळीत झपाट्याने घट झाल्याचे समोर आले. यात भोकरदन तालुक्यातील भूजल पातळीत - ४.६२ मीटरने घट झाली. तर परतूर तालुक्यातील -४.३६, अंबड तालुक्यातील भूजल पातळीत -४.०९ घट झाली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळGovernmentसरकार