शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ््यातच जालना जिल्ह्याची टँकरवर मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:36 IST

जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातच ४१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा पाऊस न पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत झपाट्याने घट होत असून, या वर्षी जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यातच ३.४७ मीटरने भूजल पातळीत घट झाली आहे. तर जिल्हाभरातील ८७ पैकी ३१ बोअरवेल नोव्हेंबर महिन्यातच कोरडेठाक पडले आहे. या सर्व परिस्थितीमुळे जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातच ४१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात ही परिस्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याची गरज आहे.यावर्षी पावसाळ््याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात वरुणराजा बरसला. परंतु, त्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्याने शेतक-यांनी लागवड केलेली पिके करपून केली. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच सध्या भूजल पातळीत घट झाल्यामुळे जिल्हाभरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच जिल्ह्यातील ३७ बोअरवेल कोरडेठाक पडले आहे. परिणामी, जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातच ४१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येणा-या काळात जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्तक राहण्याची गरज आहे.जाफराबाद, भोकरदन तालुक्यात सर्वाधिक टँकरजालना जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये ४१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यात भोकरदन तालुक्यातील १८ गावांमध्ये सवार्धिक २४ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर जाफराबाद तालुक्यातील ११ गावांमध्ये १४ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर बदनापुर तालुक्यात १, अंबड तालुक्यात १ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर जालना, मंठा, परतूर घनसावंगी तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत नाही.भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ११० विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. या सर्वच विहिंरीमधील भूजल पातळीत झपाट्याने घट झाल्याचे समोर आले. यात भोकरदन तालुक्यातील भूजल पातळीत - ४.६२ मीटरने घट झाली. तर परतूर तालुक्यातील -४.३६, अंबड तालुक्यातील भूजल पातळीत -४.०९ घट झाली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळGovernmentसरकार