शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

धनंजय मुंडेंनी भेट का घेतली? बैठकीत काय घडलं? मनोज जरांगे पाटलांनी सगळंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 12:36 IST

Manoj Jarange Patil : आज मंत्री धनंजय मुंडे यांनी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : शनिवारी ७ जुलैच्या मध्यरात्री कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक धनंजय मुंडे यांची भेट घेतली. अंतरवली सराटी येथे जाऊन मुंडे यांनी ही भेट घेतली. मुंडे आणि जरांगे यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली. याबाबत आता मनोज जरांगे पाटील यांनी माहिती दिली आहे. आज पत्रकार परिषदेत बोलनाता जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली. या बैठकीत काही विशेष चर्चा झाली नसून फक्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे. 

'शरद पवारांच्या डोक्यात काय चाललं हे १०० जन्म तुम्हाला कळणार नाही'; संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं

आज सकाळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मध्यरात्री मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील माहिती दिली. मनोज जरांगे पाटील म्हणाले, "आमच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मध्ये ते आंदोलनात मध्यस्तीही होते. आरक्षणावरही चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत आम्ही पाडायचे आहेत की उभा करायचे आहेत, याचाच अजून निर्णय झालेला नाही. निवडणुकीवर या बैठकीत काहीही चर्चा झालेली नाही, असंही जरांगे यांनी स्पष्ट केले. 

"मी माझ्या मुद्द्यावर आजही ठाम आहे. गरीब मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे यावर मी ठाम आहे. त्यांनीच आधी यावर सूचना काढली आहे. आमच्या तीनही गॅझेटवर चर्चा झाली होती, तेही त्या बैठकीत उपस्थित होते, असंही जरांगे पाटील म्हणाले. "घोंगडी बैठक ताकदीने होणार आहेत, गरीब मराठा घरी बसणार नाही. जातीसाठी सगळी एकत्र येणार. मी आहे तो पर्यंत मी कोणाचाच होऊ शकत नाही. मी महाविकास आघाडीचा नाही आणि महायुतीचाही नाही. अंतरवली सराटी येथे कोणही येऊ शकतो. मी फक्त मराठा समाजाचा आहे, असंही जरांगे म्हणाले. 

'चांगलं काम केल्यावर कौतुकही करणार'

"शंभुराज देसाई यांनी कुणबींना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली ओबीसी समाजाला, मी त्यावेळी फक्त कुणबींना करा म्हटलं असतं. पण तसं मी नाही केलं. सगळ्याच जातीचं होऊद्याना कल्याण. मी जातीयवादी नाही. त्यांनी चांगलं काम केलं तर त्यांचं कौतुकही केलं पाहिजे. आता कृषी मंत्र्यांनीही चांगलं काम केलं तर त्यांचही आम्ही कौतुक करणार, असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. 

"माझ्या समाजाला माहिती आहे, कोणही मला भेटायला आले तरीही मी कोणाचा होत नाही. मी माझ्या समाजाचा आहे. काल रात्री तीन वाजता ते मला भेटायला आले होते तेव्हा मी त्यांची भेट घेतली. भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती जरांगे यांनी दिली. 

'कधीही निवडणूक होऊद्या आम्ही तयार'

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमच्या जवळ आमचचं मतदान आहे. हे कधीही निवडणूक घेऊद्यात, आमचं पाडायचं ठरलं तर आम्ही पाडणार आणि जर आमचं लढायचं ठरलं तर आम्ही तयारच आहे. फक्त आता आम्हाला एक बैठक घ्यायची आहे. आम्ही सगळ्यांना तयार राहण्यासाठी सांगितलं आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले.   

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaratha Reservationमराठा आरक्षण