शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

रात्री जरांगे पाटलांना दिलेल्या चिठ्ठीत नेमकं काय? रावसाहेब दानवेंची दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 12:10 IST

रावसाहेब दानवे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्याशी मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा केली

मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर अखेर १७ व्या दिवशी जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, संदीपान भुमरे, राजेश टोपे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर यांचीदेखील उपस्थिती होती. शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले. तत्पूर्वी बुधवारी रात्री उशिरा रावसाहेब दानवे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी, एक चिठ्ठीही त्यांच्याहाती दिली होती. त्यामुळे, आता उपोषण मागे घेणार असल्याची चर्चा रंगली होती. 

रावसाहेब दानवे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्याशी मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा केली. पाटील यांच्या उपोषणाला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळाला असून लाखो लोकं त्यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी गावात आल्याचं आपण पाहिलं. या उपोषणामुळेच सरकारचं लक्ष मराठा समाजाच्या आरक्षणाकडे वेधलं गेलं. आता आमची मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. या चर्चेचा तपशील आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देणार आहोत. त्यानंतर, मुख्यमंत्री इकडे यायचं, कधी यायंच ते ठरवतील. त्यानंतर, उपोषण सोडायचं की नाही सोडायचं हा अधिकार सर्वस्वी मनोज जरांगे पाटील यांचा आहे. त्यामुळे, उपोषण सोडण्यासंदर्भात तेच तुम्हाला सांगतिल, असे केंद्रीय मंत्री आणि जालन्यातील नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

जरांगे पाटलांना दिली चिठ्ठी

रावसाहेब दानवे यांनी बुधवारी रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी, त्यांना एक चिठ्ठीही दिली, त्याबद्दल दानवेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर, मनोज जरांगे पाटील यांनी मला फोन नंबर लिहून दिले, माझ्याकडे एकही फोन नंबर नव्हता. मी ते फोन नंबर लिहून घेतले, अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी चिठ्ठीबाबत दिली.

दरम्यान, मी उपोषणस्थळी दिल्लीहून आलो, गिरीश महाजन हे मुंबईतून आले. त्यामुळे, कुठलंही शेड्युल ठरलेलं नव्हतं, अचानक हा भेटीचा दौरा करण्यात आल्याचं दानवे पाटील यांनी सांगितलं. 

आरक्षण मिळवून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही - शिंदे

"मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच मनोजला भेटायचं हे मी ठरवलं होतं. आपली भूमिका मी अगदी स्पष्टपणे मांडली आहे, उपोषण सोडलं त्याबद्दल आभारी आहे, असंही शिंदेंनी सांगितलं. "तुमचा मुलगा भारी आहे, स्वत: साठी नाही तर समाजासाठी लढतोय हे मी मनोजच्या वडिलांना सांगितलं. जेव्हा जेव्हा मला मनोज भेटला तेव्हा त्याने मराठा आरक्षणाबद्दलच चर्चा केली. मनोजला मनापासून शुभेच्छा आणि त्याचं मनापासून अभिनंदन करतो, आंदोलन करणं, आमरण उपोषण करणं ते जिद्दीने पुढे नेणं आणि त्याला महाराष्ट्रात जनतेचा प्रतिसाद मिळतो हे फार कमी वेळी पाहायला मिळतं. ज्याचा हेतू शुद्ध असतो त्याच्यामागे जनता पाहायला मिळते."

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणraosaheb danveरावसाहेब दानवेChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदे