शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

जालन्यात पाणीबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 00:50 IST

गोकुळ येथे विहिरीतून पाणी शेंदताना दिपाली विष्णू शिंदे (१७) या मुलीचा मृत्यू झाला.

भोकरदन (जि.जालना) : तालुक्यातील गोकुळ येथे विहिरीतून पाणी शेंदताना दिपाली विष्णू शिंदे (१७) या मुलीचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पाणीटंचाईने दिपालीचा बळी घेतला.दिपाली, तिची लहान बहिण रूपाली या आई लंकाबाई शिंदे यांच्यासोबत गावालगत असलेल्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. आई कपडे धुत असताना दिपाली विहिरीतून पाणी शेंदून देत होती. दरम्यान तोल जाऊन ती विहीरीत पडली. आई व बहिनीने आरडाओरड करताच ग्रामस्थांनी धाव घेतली. परंतु, डोक्याला मार लागून ती मृत पावली होती.तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. तालुक्यातील गोकूळ या एक हजार ८०० लोकसंख्या असलेल्या गावासाठी दानापूर येथे विहीर अधिग्रहण करून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र, विहिरीतील पाणी संपल्याने सरपंच समाधान शेरकर यांनी गोकूळ गावासाठी बानेगाव येथून प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र, तलाठी अभय कुलकर्णी यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी केली नसल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशी माहिती सरपंच शेरकर यांनी दिली.पंधरा दिवसात तिघांचा मृत्यूगोकूळ येथे पंधरा दिवसापूर्वी केळना नदीच्या पात्रात वाळू चा उपसा करीत असताना दोन तरूण मुलांचा वाळू खाली दबून मृत्यू झाला होता. यात शनिवारी पुन्हा दिपालीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी सकाळी गावात सर्वांनी गुढी उभारली होती. मात्र, या घटनेनंतर गावामध्ये कोणीही सण साजरा केला नाही.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातwater shortageपाणीटंचाई