शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

धरणातील चरच ठरतेय पाण्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:51 IST

भोकरदन तालुक्यातील मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर असलेल्या पद्मावती धरण हे नेहमी दुष्काळाच्या काळात उत्तर भोकरदन मधील गावातील नागरिकांना उपयुक्त ठरत असते.

ठळक मुद्देदुष्काळाची दाहकता वाढली : पद्मावती धरणाची पाणी पातळी खालावल्याने खोदली चर

जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर असलेल्या पद्मावती धरण हे नेहमी दुष्काळाच्या काळात उत्तर भोकरदन मधील गावातील नागरिकांना उपयुक्त ठरत असते. मात्र, आता दुष्काळाची दाहकता वाढली असल्याने तसेच या धरणावर पाण्यासाठी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून टँकरचा ओढा असल्याने या धरणातील पाणी पातळी आता जोत्याखाली आली असल्याने या धरणात आता परिसरातील ग्रामपचांयतीने चर खोंदुन पाण्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.दरम्यान प्रशासकीय बैठकीत चर खोदुन पाण्याची व्यवस्था करावी अशा देखील सुचना यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. तालुका प्रशासन देखील आता पाण्याच्या शोधात भर उन्हात धावपळ करु लागले आहे. तालुक्यात यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने परिसरातील नदी, नाले, तलाव, लघु, मध्यम प्रकल्प यांनी हिवाळ््याच्या प्रारंभीच तळ गाठला होता. त्यामुळे तालुक्यात पाणीबाणी निर्माण झाली असून ८९ गावांमध्ये १०५ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे.तालुक्यात दुष्काळी परिस्थितीत पाण्यासाठी उपयुक्त ठरणारे दानापूर येथील जुई धरण तसेच शेलुद येथील धामणा धरण हे कधीचेच आटले आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्याची भिस्त ही बाणेगाव व पद्मावती धरणावर येऊन ठेपली आहे. मात्र, त्यात देखील आता झपाट्याने पाणी उपसा सुरु असल्याने हे दोन्ही धरणातील पाणी पातळी देखील धोक्यात आली आहे.येणाऱ्या काळात नागरिकांना पाण्यासाठी अडचण भासू नये म्हणून तालुका प्रशासन देखील भर उन्हात टंचाईग्रस्त भागात भेट देऊन पाणी टंचाईचा आढावा घेऊन त्या दिशेने उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.सध्या पद्मावती, जुई धरण व बाणेगाव येथील धरणात प्रशासनाने मोठाले सहा चर खोदण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे.या व्यतिरिक्त अठरा ग्रामपचांयतीने लोकसहभाग व चौदाव्यावित्त आयोगातुन चर खोदुन आपली पाण्याची व्यवस्था करुन घेतली आहे. मात्र, चराचे पाणी हे दिर्घ कालीन टिकणारे नसल्याने आणखी काही दिवसात अडचणी निर्माण होऊ शकत असल्याचे ग्रामपचांयतीने सांगितले आहे.

टॅग्स :JalanaजालनाDamधरणwater shortageपाणीटंचाई