शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

धरणातील चरच ठरतेय पाण्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:51 IST

भोकरदन तालुक्यातील मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर असलेल्या पद्मावती धरण हे नेहमी दुष्काळाच्या काळात उत्तर भोकरदन मधील गावातील नागरिकांना उपयुक्त ठरत असते.

ठळक मुद्देदुष्काळाची दाहकता वाढली : पद्मावती धरणाची पाणी पातळी खालावल्याने खोदली चर

जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर असलेल्या पद्मावती धरण हे नेहमी दुष्काळाच्या काळात उत्तर भोकरदन मधील गावातील नागरिकांना उपयुक्त ठरत असते. मात्र, आता दुष्काळाची दाहकता वाढली असल्याने तसेच या धरणावर पाण्यासाठी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून टँकरचा ओढा असल्याने या धरणातील पाणी पातळी आता जोत्याखाली आली असल्याने या धरणात आता परिसरातील ग्रामपचांयतीने चर खोंदुन पाण्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.दरम्यान प्रशासकीय बैठकीत चर खोदुन पाण्याची व्यवस्था करावी अशा देखील सुचना यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. तालुका प्रशासन देखील आता पाण्याच्या शोधात भर उन्हात धावपळ करु लागले आहे. तालुक्यात यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने परिसरातील नदी, नाले, तलाव, लघु, मध्यम प्रकल्प यांनी हिवाळ््याच्या प्रारंभीच तळ गाठला होता. त्यामुळे तालुक्यात पाणीबाणी निर्माण झाली असून ८९ गावांमध्ये १०५ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे.तालुक्यात दुष्काळी परिस्थितीत पाण्यासाठी उपयुक्त ठरणारे दानापूर येथील जुई धरण तसेच शेलुद येथील धामणा धरण हे कधीचेच आटले आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्याची भिस्त ही बाणेगाव व पद्मावती धरणावर येऊन ठेपली आहे. मात्र, त्यात देखील आता झपाट्याने पाणी उपसा सुरु असल्याने हे दोन्ही धरणातील पाणी पातळी देखील धोक्यात आली आहे.येणाऱ्या काळात नागरिकांना पाण्यासाठी अडचण भासू नये म्हणून तालुका प्रशासन देखील भर उन्हात टंचाईग्रस्त भागात भेट देऊन पाणी टंचाईचा आढावा घेऊन त्या दिशेने उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.सध्या पद्मावती, जुई धरण व बाणेगाव येथील धरणात प्रशासनाने मोठाले सहा चर खोदण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे.या व्यतिरिक्त अठरा ग्रामपचांयतीने लोकसहभाग व चौदाव्यावित्त आयोगातुन चर खोदुन आपली पाण्याची व्यवस्था करुन घेतली आहे. मात्र, चराचे पाणी हे दिर्घ कालीन टिकणारे नसल्याने आणखी काही दिवसात अडचणी निर्माण होऊ शकत असल्याचे ग्रामपचांयतीने सांगितले आहे.

टॅग्स :JalanaजालनाDamधरणwater shortageपाणीटंचाई