शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

चार दिवसाआड होणार शहरवासीयांना पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 00:45 IST

लवकरच शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नवीन जालना भागाला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. मात्र, समृद्धी महामार्गाच्या कामात फुटलेली पाईपलाईन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात अडथळा निर्माण झाली होती. या फुटलेल्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. हे काम अंतीम टप्प्यात असून, लवकरच शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.गतवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सरासरीच्या अपेक्षित पाऊस झालेला नव्हता. जुना जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी प्रकल्पात अपुरा पाणीपुरवठा होता. तर नवीन जालना भागाला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी प्रकल्प कोरडाठाक पडला होता. त्यामुळे शहरातील पाणीवितरण व्यवस्थेवर परिणाम झाला होता. जायकवाडी प्रकल्पातून मिळणाºया पाण्यावर पालिकेने पाणीवितरणाचे नियोजन केले होते. मात्र, अनेक भागात दहा ते बारा दिवसानंतर पाणीपुरवठा होत होता. मात्र, परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आणि जायकवाडी प्रकल्पासह घाणेवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे आता जुना जालना व नवीन जालना भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.नवीन जालना भागाला घाणेवाडी प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, समृध्दी महामार्गाच्या कामात या पाणीपुरवठा योजनेवरील पाईप फुटले होते. घाणेवाडी प्रकल्प भरल्याने नवीन जालना भागाचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे फुटलेल्या पाईपलाईनच्या दुरूस्तीचे कामही पालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. हे काम चार ते पाच दिवसात पूर्ण होण्याची आशा पालिकेकडून वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर जुना जालनासह नवीन जालना भागात चार दिवसाला पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदWaterपाणीcivic issueनागरी समस्या