शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 23:56 IST

मंगळवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले असून, यामुळे डाळिंब, द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जालना : आधी पावसाची हुलकावणी, मध्ये अवकाळी पावसाचे संकट आणि नंतर आता पुन्हा रबी हंगामात जोमात असलेल्या पिकांवर गारपिटीचा हल्ला यामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. मंगळवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले असून, यामुळे डाळिंब, द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात गहू आणि हरभ-याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून बळीराजाला दिलासा देण्यासाठी जवळपास सर्वच लोकप्रतिनिधींनी बुधवारी सकाळी थेट नुकसान झालेल्या शेतात जाऊन पाहणी करून दिलासा देत शासकीय मदतीचे आश्वासन दिले.परतूर तालूक्यात काढणीस आलेल्या पिकांचे नुकसानपरतूर : तालूक्यात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने काढणीस आलेल्या व काढून घेतलेल्या ज्वारी व गव्हाचे काही प्रमाणात नुकसान झाले.परतूर तालुक्यात मंगळवारी रात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. सध्या ज्वारी, गव्हाची काढणी सुरू आहे. या पावसाने काढणीस आलेल्या व शेतात काढून ठेवलेल्या गव्हू व ज्वारीचे काही प्रमाणात नुकसान झाले. या पावसात वादळी वारा मोठ्या गारांचा समावेश नसल्याने पिकांचे फारसे नुकसान झाले नाही.दरम्यान उशिरा पेरलेल्या गहू, ज्वारी, हरभरासह ईतर पिकांना मात्र हा पाउस लाभदायक ठरला. या पावसा दरम्यान काही काळ वीज गुल झाली होती. विजांंचा कडकडाट व मेघगर्जनेसह हा पाउस झाल्याने बराच काळ वीज गायब होती.जालना तालुक्यात नुकसान, गोरंट्याल यांनी केली पाहणीजालना : जालना तालुक्यातील जवळपास १४ ते ३० गावांमध्ये मंगळवारी रात्री हलका ते जोरदार पाऊस पडला. काही गावांमध्ये गारपीटही झाली. या पावसाने हाततोंडाशी आलेला घास हिरवला असून, या सर्व नुकसानीची पाहणी आ. कैलास गोरंट्याल यांनी तहसीलदार श्रीकांत भुजबळ, तालुका कृषी अधिकारी गाढेकर, मंडळ अधिकारी व्ही.एस. लोखंडे, तलाठी कळकुंबे, मोरे यांच्यासोबत केली. आ. गोरंट्याल यांनी कडवंची, वरूड, वडगाव, न्हावा, वडगाव, धारकल्याण आदी गावांना भेटी दिल्या. कडवंची येथे द्राक्ष बागांना भेटी देऊन त्यांनी शेतकºयांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. तसेच नुकसानीचे रितसर पंचनामे करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले. या पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारीसह फळबांगाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.राणी उंचेगाव परिसरात खोतकरांकडून पाहणीराणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव परिसरामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे खरिपाच्या पिकांबरोबर मोसंबी, द्राक्षे, डाळिंब, आंबा या फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे. गाढे सावरगांव येथील द्राक्ष बागाची माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, नायब तहसीलदार उन्हाळे, कृषी मंडळ अधिकरी पुरी, डी.के.अंबडकर, संजय लोंढे, ढगे, तलाठी पुष्पा सानप, सखाराम भुतेकर तसेच कृषी आणि महसूल विभागातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते. राणी उंचेगाव परिसरातील गाढे सावरगाव, मुढेगाव, तळेगाव, राठी अंतरवाली, मानेपुरी, चापडगाव, पानेवाडी, दाई अंतरवाली, भुतेगाव, निपाणी पिंपळगाव, रवना, मंगू जळगाव या गावांमध्ये रात्री जोरदा पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसाने मोसंबीच्या अंब्या बहाराची बोराच्या व लिंबाच्या आकाराची फळे गळून पडली. द्राक्ष बागांमध्ये गारपिटीमुळे द्राक्षांचे घड गळून जमिनीवर पडल्याने द्राक्षांचे मोठे नुकसान झाले. आंबा, डाळिंब या फळबागांनाही या गारपिटीचा फटका बसला.संतोष दानवेंकडून पाहणीजाफराबाद : तालुक्यातील आंबेगाव, डहाके वाडी, गाडेगव्हाण, देळेगव्हाण, गणेशपूर, अकोला देव, टेंभुर्णी आणि भातोडी भागात अचानक झालेल्या गारपीट व वादळी वाºयासह मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाला.या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी आ. संतोष दानवे यांनी बुधवारी केली. त्यांनी विविध शेतकºयांच्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान जाणून घेतले. तसेच उपविभागीय अधिकाºयांना तातडीने पंचनामे करण्याचे सूचना दिल्या आहेत. या पावसामुळे प्रामुख्याने गहू, ज्वारी, मका,कांदा,हरभरा व शेडनेटमध्ये घेत असलेल्या विविध पिकांचे नुकसान झाले आहे. या पाऊस आणि वादळी वाºयामुळे मौजे आंबेगाव येथील गावातील जि.प.शाळेचे पत्रे उडून गेले. तसेच गावातील श्रीरंग गोफणे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. यावेळी तहसीलदार सोनी, गंगावणे , शेराण पठाण उपस्थित होते.घनसावंगी शहरासह तालुक्यात द्राक्ष, फळबागांचे नुकसानघनसावंगी : तालुक्यातील शेतक-यांच्या मागे सुरू असलेल्या संकटाचा ससेमिरा काही केल्या संपेना. नैसर्गिक आपत्तीची जणू काही सारखी रांगच आहे. मंगळवारी रात्री पुन्हा ८ वाजेनंतर घनसावंगी तालुक्यात जोरदार वादळी वा-यासह पाऊस व गारा कोसळल्या.यामुळे शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेल्या ज्वारी, हरभरा, गहू पिकाचा घास हिसकवला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पिकाबरोबरच द्राक्ष, मोसंबी आंबे या फळबागांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.घनसावंगी शहरासह तालुक्यातील राणी उंचेगाव, आंतरवाली टेंभी, करडगाव, आंतरवली राठी, खडका, खालापुरी, भायगव्हाण या गावात १७ रोजी रात्री जोरदार पाऊस झाला. यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीNatureनिसर्ग