शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळातही मानापुरात नळांना दररोज पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:14 IST

भोकरदन तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना सुध्दा मानापूर गावात मात्र पाण्याचा चांगलाच सुकाळ आहे.

फकिरा देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना सुध्दा मानापूर गावात मात्र पाण्याचा चांगलाच सुकाळ आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे ग्रामस्थांना नियमित पाणी पुरवठा करणारी तालुक्यातील ही एकमेव ग्रामपंचायत आहे.भोकरदन शहरापासून चार कि़मी. अंतरावर मानापूर हे १८३ कुटुंब असलेले गाव असून या गावाची लोकसंख्या ११५० एवढी आहे. या गावाला २०१२ पूर्वी नेहमी पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. तत्कालीन सरपंच योगेश दळवी यांच्या प्रयत्नातून २०१२ - २०१३ मध्ये भारत निर्माण योजनेअंतर्गत दानापूर येथील जुई धरणातून १४ लाख रुपये खर्च करून ४ किलोमीटर पाईप लाईन करण्यात आली तेव्हा पासून मानापूर गावासाठी शासनाला टँकर लावण्याचे काम पडले नाही. यावर्षी तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिक पाण्यासाठी भटकत आहेत. मात्र येथील ग्रामस्थांना रोज ६५ हजार लिटर पाणी नियमित सोडण्यात येत आहे. या वर्षी एप्रिल महिन्यातच विहिरींनी तळ गाठला होता. सध्या होत असलेले पाणी शुध्द करून देण्यासाठी स्वतंत्र फिल्टर प्लांटची गरज वर्तवली.ग्रामपंचायत स्थापनेपासून बिनविरोध निवडणूकगाव म्हटले की राजकारण येते व गावातील सरपंचाची खुर्ची आली की वेगवेळ्या पक्षाची स्पर्धा होते. मात्र मानापूर या गावातील सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मानापूरला ग्रामपंचायत स्थापन झाली तेव्हा पासून गावातील सर्व पक्षियांनी एकत्र येऊन दळवी यांच्या नेतृत्वाखाली चार पंचवार्षिक पासून ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध केली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतWaterपाणीdroughtदुष्काळ