शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

दुष्काळातही मानापुरात नळांना दररोज पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:14 IST

भोकरदन तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना सुध्दा मानापूर गावात मात्र पाण्याचा चांगलाच सुकाळ आहे.

फकिरा देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना सुध्दा मानापूर गावात मात्र पाण्याचा चांगलाच सुकाळ आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे ग्रामस्थांना नियमित पाणी पुरवठा करणारी तालुक्यातील ही एकमेव ग्रामपंचायत आहे.भोकरदन शहरापासून चार कि़मी. अंतरावर मानापूर हे १८३ कुटुंब असलेले गाव असून या गावाची लोकसंख्या ११५० एवढी आहे. या गावाला २०१२ पूर्वी नेहमी पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. तत्कालीन सरपंच योगेश दळवी यांच्या प्रयत्नातून २०१२ - २०१३ मध्ये भारत निर्माण योजनेअंतर्गत दानापूर येथील जुई धरणातून १४ लाख रुपये खर्च करून ४ किलोमीटर पाईप लाईन करण्यात आली तेव्हा पासून मानापूर गावासाठी शासनाला टँकर लावण्याचे काम पडले नाही. यावर्षी तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिक पाण्यासाठी भटकत आहेत. मात्र येथील ग्रामस्थांना रोज ६५ हजार लिटर पाणी नियमित सोडण्यात येत आहे. या वर्षी एप्रिल महिन्यातच विहिरींनी तळ गाठला होता. सध्या होत असलेले पाणी शुध्द करून देण्यासाठी स्वतंत्र फिल्टर प्लांटची गरज वर्तवली.ग्रामपंचायत स्थापनेपासून बिनविरोध निवडणूकगाव म्हटले की राजकारण येते व गावातील सरपंचाची खुर्ची आली की वेगवेळ्या पक्षाची स्पर्धा होते. मात्र मानापूर या गावातील सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मानापूरला ग्रामपंचायत स्थापन झाली तेव्हा पासून गावातील सर्व पक्षियांनी एकत्र येऊन दळवी यांच्या नेतृत्वाखाली चार पंचवार्षिक पासून ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध केली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतWaterपाणीdroughtदुष्काळ