शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

२ लाख विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:27 IST

जिल्हा परिषदेच्या शाळेतील २ लाख विद्यार्थ्यांना शाळेत मूल्यवर्धनाचे धडे दिले जाणार आहेत.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक करुन विद्यार्थ्यांना संवेदनशील, कर्तबगार नागरिक बनावे या अनुषंगाने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील २ लाख विद्यार्थ्यांना शाळेत मूल्यवर्धनाचे धडे दिले जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्ती वाढीस मदत होणार आहे.राज्य शासन आणि शांतीलाल मुथा फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन शिक्षण देण्याचा उपक्रम होती घेण्यात आलेला आहे. २९ जुलै पासून म्हणजेच आजपासून जिल्ह्यात या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यासह जीवन जगण्यासाठी जे आवश्यक मूल्ये डोळ्यासमोर ठेवून शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरले अशी उपक्रम पुस्तिका राज्यशासनाने तयार केली आहे. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांचे नेतृत्वगुण, जबाबदारी, सहकार्याची भावना, चिकित्सक वृत्ती, सामाजिक भान तसेच सामाजिक समस्याकडे डोळसपणे कसे पाहावे याबाबत विद्यार्थ्यांना या मूल्यवर्धन शिक्षणातून सांगण्यात येणार आहे. इयत्ता १ ते ५ विद्यार्थ्यांना मूल्यवर्धनाचे शिक्षण शिक्षकामार्फत देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना आपली सामाजिक जबाबदारी काय आहे. शालेय जीवनातूनच नेतृत्वगुण फुलविण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय प्रयत्न करावे हे शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना धडे देऊन त्यांना परिपक्व करण्यासाठी राज्य शासन आणि मुथा फाऊंडेशनच्या वतीने हा उपक्रम सुरु केलेला आहे. जिल्ह्यात सोमवार पासून या उपक्रमाला सुरुवात होणार असून, ६ हजार १६९ शिक्षकांना टप्याटप्याने तज्ज्ञ मंडळीकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षक दैनंदिन अध्यापन करताना हे मूल्यवर्धन उपक्रमाशी सांगड घालतील.शासनाने विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेला हा उपक्रम जिल्ह्यात चांगल्या प्रकारे राबविण्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे.विद्यार्थी आणि शिक्षकासाठी उपक्रम पुस्तिका तयार करण्यात आलेल्या आहेत. सर्व तालुकास्तरावर पुस्तिका पोहोचविण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांचे प्रशिक्षण संपल्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून विद्यार्थ्यांना मूल्यवर्धनाचे प्रत्यक्षात धडे देण्यात येणार असल्याचे मूल्यवर्धक शिक्षण विभागाचे जिल्हा समन्वयक सतीश सातव यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थीJalna z pजालना जिल्हा परिषद