शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

४६ महसूल मंडळांत पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:39 IST

जिल्ह्यातील ४९ महसूल मंडळांपैकी ४६ महसूल मंडळात पावसाने कमी- अधिक प्रमाणात हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून हलक्या, मध्यम स्वरूपात पावसाने हजेरी लावली आहे. गुरूवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १४.९१ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यातील ४९ महसूल मंडळांपैकी ४६ महसूल मंडळात पावसाने कमी- अधिक प्रमाणात हजेरी लावली. दरम्यान, जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूर्णा व गोदावरी नद्यांसह इतर नद्यांचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.चालू आठवड्यात सतत पडणा-या पावसामुळे जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८ मिमी असून, गुरूवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ५०६.४२ मिमी पाऊस झाला आहे. यात जालना महसूल मंडळात १२ मिमी, जालना ग्रामीण २६ मिमी, रामनगर ११ मिमी, विरेगाव १५ मिमी, नेर ३ मिमी, सेवली २५ मिमी, पाचनवडगाव ११ मिमी, वाग्रूळ जहागीर १० मिमी, बदनापूर २९, रोषणगाव १० मिमी, दाभाडी २४ मिमी, सेलगाव ५ मिमी, बावणे पांगरी ५ मिमी पाऊस झाला. तर भोकरदन तालुक्यातील भोकरदन ३४ मिमी, सिपोरा बाजार ३० मिमी, धावाडा ५२ मिमी, पिंपळगाव रेणुकाई ३४ मिमी, हस्राबाद ४७ मिमी, राजूर ९ मिमी, केदारखेडा ३९ मिमी, आन्वा १० मिमी पाऊस झाला. जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद ५ मिमी, टेंभुर्णी १२ मिमी, कुंभारझरी ४ मिमी, वरूड १५ मिमी, माहोरा २० मिमी पाऊस झाला. परतूर ८ मिमी, सातोना २.५० मिमी, आष्टी २८ मिमी, वाटूर १८ मिमी, मंठा २ मिमी, ढोकसाल ३२ मिमी, पांगरी गोसावी ७ मिमी पाऊस झाला. अंबड ७ मिमी, धनगर पिंपरी २० मिमी, जामखेड ४ मिमी, रोहिलागड १२ मिमी, सुखापुरी १० मिमी, घनसावंगी १८ मिमी, राणीउंचेगाव २५ मिमी, रांजणी १२ मिमी, तीर्थपुरी २ मिमी, कुंभारपिंपळगाव १३ मिमी, अंतरवली टेंबी ९ मिमी, जांभ समर्थ २ मिमी पाऊस झाला. दरम्यान, सततच्या पावसामुळे उर्वरित कालावधीत परतीचा पाऊस दमदार हजेरी लावेल, अशी आशा निर्माण झाली आहे.गोदावरी नदीपात्रात ४५ हजार क्युसेक्सचा विसर्गशहागड : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात ३५ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. जायकवाडीच्या धरण क्षेत्रात येणाºया पाण्याची आवक वाढली तर मध्यरात्रीच्या सुमारास जवळपास ५० हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याचे तहसीलदार महेश सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जायकवाडी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीपात्र दुथडी वाहत आहे. येथील बंधा-यावर पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पाण्याची आवक वाढल्यानंतर कोणताही धोका होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली असून, आपत्ती व्यवस्थापन पथकही सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिली.जायकवाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने या प्रकल्पातून ३५ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शिवाय आपत्ती व्यवस्थापन, बचाव साहित्य सज्ज ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी नदी, नाले, ओढ्यात प्रवेश करू नये.पुलावरून पाणी वाहत असेल तर वाहने नेऊ नयेत, जनावरांना नदीपात्रात जाऊ देऊ नये, नदीच्या पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करू नये, अफवांवर विश्वास ठेऊ नये, ग्रामपंचायतींनी दवंडी देऊन नागरिकांना दक्षतेबाबत सूचना द्याव्यात, अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिल्याची माहिती प्रशासनाने दिली.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरriverनदीweatherहवामान