शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

४६ महसूल मंडळांत पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:39 IST

जिल्ह्यातील ४९ महसूल मंडळांपैकी ४६ महसूल मंडळात पावसाने कमी- अधिक प्रमाणात हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून हलक्या, मध्यम स्वरूपात पावसाने हजेरी लावली आहे. गुरूवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १४.९१ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यातील ४९ महसूल मंडळांपैकी ४६ महसूल मंडळात पावसाने कमी- अधिक प्रमाणात हजेरी लावली. दरम्यान, जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूर्णा व गोदावरी नद्यांसह इतर नद्यांचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.चालू आठवड्यात सतत पडणा-या पावसामुळे जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८ मिमी असून, गुरूवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ५०६.४२ मिमी पाऊस झाला आहे. यात जालना महसूल मंडळात १२ मिमी, जालना ग्रामीण २६ मिमी, रामनगर ११ मिमी, विरेगाव १५ मिमी, नेर ३ मिमी, सेवली २५ मिमी, पाचनवडगाव ११ मिमी, वाग्रूळ जहागीर १० मिमी, बदनापूर २९, रोषणगाव १० मिमी, दाभाडी २४ मिमी, सेलगाव ५ मिमी, बावणे पांगरी ५ मिमी पाऊस झाला. तर भोकरदन तालुक्यातील भोकरदन ३४ मिमी, सिपोरा बाजार ३० मिमी, धावाडा ५२ मिमी, पिंपळगाव रेणुकाई ३४ मिमी, हस्राबाद ४७ मिमी, राजूर ९ मिमी, केदारखेडा ३९ मिमी, आन्वा १० मिमी पाऊस झाला. जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद ५ मिमी, टेंभुर्णी १२ मिमी, कुंभारझरी ४ मिमी, वरूड १५ मिमी, माहोरा २० मिमी पाऊस झाला. परतूर ८ मिमी, सातोना २.५० मिमी, आष्टी २८ मिमी, वाटूर १८ मिमी, मंठा २ मिमी, ढोकसाल ३२ मिमी, पांगरी गोसावी ७ मिमी पाऊस झाला. अंबड ७ मिमी, धनगर पिंपरी २० मिमी, जामखेड ४ मिमी, रोहिलागड १२ मिमी, सुखापुरी १० मिमी, घनसावंगी १८ मिमी, राणीउंचेगाव २५ मिमी, रांजणी १२ मिमी, तीर्थपुरी २ मिमी, कुंभारपिंपळगाव १३ मिमी, अंतरवली टेंबी ९ मिमी, जांभ समर्थ २ मिमी पाऊस झाला. दरम्यान, सततच्या पावसामुळे उर्वरित कालावधीत परतीचा पाऊस दमदार हजेरी लावेल, अशी आशा निर्माण झाली आहे.गोदावरी नदीपात्रात ४५ हजार क्युसेक्सचा विसर्गशहागड : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात ३५ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. जायकवाडीच्या धरण क्षेत्रात येणाºया पाण्याची आवक वाढली तर मध्यरात्रीच्या सुमारास जवळपास ५० हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याचे तहसीलदार महेश सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जायकवाडी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीपात्र दुथडी वाहत आहे. येथील बंधा-यावर पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पाण्याची आवक वाढल्यानंतर कोणताही धोका होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली असून, आपत्ती व्यवस्थापन पथकही सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिली.जायकवाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने या प्रकल्पातून ३५ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शिवाय आपत्ती व्यवस्थापन, बचाव साहित्य सज्ज ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी नदी, नाले, ओढ्यात प्रवेश करू नये.पुलावरून पाणी वाहत असेल तर वाहने नेऊ नयेत, जनावरांना नदीपात्रात जाऊ देऊ नये, नदीच्या पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करू नये, अफवांवर विश्वास ठेऊ नये, ग्रामपंचायतींनी दवंडी देऊन नागरिकांना दक्षतेबाबत सूचना द्याव्यात, अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिल्याची माहिती प्रशासनाने दिली.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरriverनदीweatherहवामान