शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

दीड लाख शेतकऱ्यांची माहिती शासकीय वेबसाईटवर अपलोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 01:15 IST

राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांची माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांची माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीनंतर शासनाची कर्जमुक्तीसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द होणार आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील तब्बल २ हजार ८३२ शेतक-यांनी आपल्या कर्जखात्याशी आधार नंबर लिंकिंग केला नसल्याची माहिती समोर आली आहे.आघाडी शासनाने २ लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. या कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्यात ज्या शेतक-यांच्या बँक खात्याशी आधार नंबर लिंक नाही त्यांनी आपला आधार नंबर बँक खात्याशी लिंक करावा, यासाठी प्रशासकीय, बँक पातळीवरून जनजागृती करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील दोन लाखांच्या आतील कर्ज असलेल्या २ लाख ४ हजार ४६२ शेतक-यांपैकी ३१ हजार ५५४ शेतक-यांचे आधार नंबर कर्ज खात्याशी संलग्न नसल्याचे समोर आले होते. त्यानुसार राबविलेल्या प्रक्रियेत आजवर २८ हजार ७७२ शेतक-यांनी आपले आधार नंबर कर्जखात्याशी लिंकिंग करून घेतले आहेत. तर अद्यापही २ हजार ८३२ शेतक-यांचे नंबर कर्जखात्याशी लिंक झालेले नाहीत.आधार लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँकेमार्फत शासनाच्या पोर्टलवर लाभार्थी शेतक-यांची माहिती आपलोड करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानुसार आजवर १ लाख ५५ हजार ६१४ शेतकºयांची माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. ९१० शेतक-यांना लेखी पत्रकर्जमाफीस पात्र ठरणा-या शेतक-यांनी बँकेतील कर्ज खात्याशी आधार लिंकिंग करून घ्यावे, यासाठी प्रशासन, बँकांनी जनजागृती केली आहे. विशेषत: जिल्हा बँकेच्या तब्बल ९१० शेतक-यांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने लेखी पत्र देण्यात आले आहेत. मात्र, यातील जवळपास १०० शेतक-यांनी आधार लिंकिंग केली असून, इतर शेतक-यांनी अद्यापही आधार लिंकिंग केले नसल्याचे समजते.समिती करणार तक्रारीचे निरसनशासनाने कर्जमुक्तीस पात्र शेतक-यांची यादी प्रसिध्द केल्यानंतर ती बँक, पतसंस्था, ग्रामपंचायत आपले सरकार केंद्रावर प्रसिध्द केली जाणार आहे. यादीत नाव असेल तर शेतकºयांनी आपले सरकार केंद्रावर जाऊन आधार नंबर आणि कर्जमाफी यादीतील आपला विशिष्ट नंबर देऊन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. कर्जमुक्तीची रक्कम मान्य असेल तर होकार द्यावा अन्यथा आपली तक्रार आॅनलाईन पध्दतीने नोंदवावी. ही तक्रार आॅनलाईन पध्दतीने तात्काळ जिल्हा समितीकडे येणार असून, जिल्हा समिती या तक्रारीचे निरसन करणार आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAdhar Cardआधार कार्डFarmerशेतकरी