शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

रेल्वे रद्द झाल्यामुळे ट्रॅव्हल्सवाल्यांची चांदी; मुंबईचे तिकीट १४०० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 14:53 IST

रविवारी मुंबई, पुण्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सचालकांकडून रविवारी जास्तीचे भाडे आकारले जात

जालना : मध्य रेल्वेकडून दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याने जनशताब्दीसह अनेक रेल्वेगाड्या २६ ते २९ जूनदरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. याच संधीचा फायदा घेऊन ट्रॅव्हल्सवाल्यांनी भाडेवाढ केली आहे. मुंबईसाठी १४०० रुपये, तर पुण्यासाठी ७०० रुपयांचे भाडे आकारले जात आहे, असे असतानाही याकडे आरटीओ कार्यालयाचे दुर्लक्ष पहायला मिळत आहे याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

मध्य रेल्वेच्या अंकाई किल्ला-मनमाडदरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम २९ जूनपर्यंत चालणार आहे. त्यामुळे २५ ते २९ जूनदरम्यान जनशताब्दी एक्स्प्रेससह अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात मुंबई - जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, नांदेड - मनमाड एक्स्प्रेस, काकीनाडा पोर्ट - साईनगर शिर्डी आदी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. जालन्यातून मुुंबई, पुण्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शिवाय, बहुतांश जण जालना ते औरंगाबाद अपडाऊनदेखील करतात. रेल्वेगाड्या बंद असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. रेल्वेगाड्या बंद असल्याने प्रवासी ट्रॅव्हल्सला पसंती देत आहेत; मात्र ट्रॅव्हल्सचालकांनी मोठ्या प्रमाणात भाडेवाढ केली आहे. मुंबईला जाण्यासाठी चक्क १४०० रुपये घेतले जात आहेत, तर पुण्याला जाण्यासाठी ७०० किंवा ८०० रुपयांचे तिकीट दिले जात आहे, असे असतानाही प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत आरटीओ अधिकारी विजय कोठाळे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

मला मुंबईला काम आहे. रेल्वे बंद असल्याने मी ट्रॅव्हल्सचे तिकीट काढण्यासाठी गेलो. त्यांनी चक्क १४०० रुपये भाडे सांगितले. त्यामुळे पुण्यासाठी विचारणा केली असता, ७०० रुपये भाडे सांगितले. त्यामुळे बसने जाण्याचा निर्णय घेतला.- अजय मोरे, प्रवासी

रविवारी जास्तीचे भाडेरविवारी मुंबई, पुण्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सचालकांकडून रविवारी जास्तीचे भाडे आकारले जात असल्याचे एका ट्रॅव्हल्समालकाने सांगितले. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. ट्रॅव्हलचालकांच्या या मनमानी कारभाराकडे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :JalanaजालनाAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन