शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

रेल्वे रद्द झाल्यामुळे ट्रॅव्हल्सवाल्यांची चांदी; मुंबईचे तिकीट १४०० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 14:53 IST

रविवारी मुंबई, पुण्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सचालकांकडून रविवारी जास्तीचे भाडे आकारले जात

जालना : मध्य रेल्वेकडून दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याने जनशताब्दीसह अनेक रेल्वेगाड्या २६ ते २९ जूनदरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. याच संधीचा फायदा घेऊन ट्रॅव्हल्सवाल्यांनी भाडेवाढ केली आहे. मुंबईसाठी १४०० रुपये, तर पुण्यासाठी ७०० रुपयांचे भाडे आकारले जात आहे, असे असतानाही याकडे आरटीओ कार्यालयाचे दुर्लक्ष पहायला मिळत आहे याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

मध्य रेल्वेच्या अंकाई किल्ला-मनमाडदरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम २९ जूनपर्यंत चालणार आहे. त्यामुळे २५ ते २९ जूनदरम्यान जनशताब्दी एक्स्प्रेससह अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात मुंबई - जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, नांदेड - मनमाड एक्स्प्रेस, काकीनाडा पोर्ट - साईनगर शिर्डी आदी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. जालन्यातून मुुंबई, पुण्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शिवाय, बहुतांश जण जालना ते औरंगाबाद अपडाऊनदेखील करतात. रेल्वेगाड्या बंद असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. रेल्वेगाड्या बंद असल्याने प्रवासी ट्रॅव्हल्सला पसंती देत आहेत; मात्र ट्रॅव्हल्सचालकांनी मोठ्या प्रमाणात भाडेवाढ केली आहे. मुंबईला जाण्यासाठी चक्क १४०० रुपये घेतले जात आहेत, तर पुण्याला जाण्यासाठी ७०० किंवा ८०० रुपयांचे तिकीट दिले जात आहे, असे असतानाही प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत आरटीओ अधिकारी विजय कोठाळे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

मला मुंबईला काम आहे. रेल्वे बंद असल्याने मी ट्रॅव्हल्सचे तिकीट काढण्यासाठी गेलो. त्यांनी चक्क १४०० रुपये भाडे सांगितले. त्यामुळे पुण्यासाठी विचारणा केली असता, ७०० रुपये भाडे सांगितले. त्यामुळे बसने जाण्याचा निर्णय घेतला.- अजय मोरे, प्रवासी

रविवारी जास्तीचे भाडेरविवारी मुंबई, पुण्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सचालकांकडून रविवारी जास्तीचे भाडे आकारले जात असल्याचे एका ट्रॅव्हल्समालकाने सांगितले. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. ट्रॅव्हलचालकांच्या या मनमानी कारभाराकडे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :JalanaजालनाAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन