शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रेल्वे रद्द झाल्यामुळे ट्रॅव्हल्सवाल्यांची चांदी; मुंबईचे तिकीट १४०० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 14:53 IST

रविवारी मुंबई, पुण्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सचालकांकडून रविवारी जास्तीचे भाडे आकारले जात

जालना : मध्य रेल्वेकडून दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याने जनशताब्दीसह अनेक रेल्वेगाड्या २६ ते २९ जूनदरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. याच संधीचा फायदा घेऊन ट्रॅव्हल्सवाल्यांनी भाडेवाढ केली आहे. मुंबईसाठी १४०० रुपये, तर पुण्यासाठी ७०० रुपयांचे भाडे आकारले जात आहे, असे असतानाही याकडे आरटीओ कार्यालयाचे दुर्लक्ष पहायला मिळत आहे याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

मध्य रेल्वेच्या अंकाई किल्ला-मनमाडदरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम २९ जूनपर्यंत चालणार आहे. त्यामुळे २५ ते २९ जूनदरम्यान जनशताब्दी एक्स्प्रेससह अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात मुंबई - जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, नांदेड - मनमाड एक्स्प्रेस, काकीनाडा पोर्ट - साईनगर शिर्डी आदी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. जालन्यातून मुुंबई, पुण्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शिवाय, बहुतांश जण जालना ते औरंगाबाद अपडाऊनदेखील करतात. रेल्वेगाड्या बंद असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. रेल्वेगाड्या बंद असल्याने प्रवासी ट्रॅव्हल्सला पसंती देत आहेत; मात्र ट्रॅव्हल्सचालकांनी मोठ्या प्रमाणात भाडेवाढ केली आहे. मुंबईला जाण्यासाठी चक्क १४०० रुपये घेतले जात आहेत, तर पुण्याला जाण्यासाठी ७०० किंवा ८०० रुपयांचे तिकीट दिले जात आहे, असे असतानाही प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत आरटीओ अधिकारी विजय कोठाळे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

मला मुंबईला काम आहे. रेल्वे बंद असल्याने मी ट्रॅव्हल्सचे तिकीट काढण्यासाठी गेलो. त्यांनी चक्क १४०० रुपये भाडे सांगितले. त्यामुळे पुण्यासाठी विचारणा केली असता, ७०० रुपये भाडे सांगितले. त्यामुळे बसने जाण्याचा निर्णय घेतला.- अजय मोरे, प्रवासी

रविवारी जास्तीचे भाडेरविवारी मुंबई, पुण्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सचालकांकडून रविवारी जास्तीचे भाडे आकारले जात असल्याचे एका ट्रॅव्हल्समालकाने सांगितले. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. ट्रॅव्हलचालकांच्या या मनमानी कारभाराकडे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :JalanaजालनाAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन