शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वेगवेगळ््या घटनांत तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 01:09 IST

विजेच्या तारेला चिकटून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रामनगर येथे घडली. तर दुसऱ्या घटनेत हिसोडा खुर्द येथे तलावात बुडून ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन / रामनगर/राजूर : विजेच्या तारेला चिकटून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रामनगर येथे घडली. तर दुसऱ्या घटनेत हिसोडा खुर्द येथे तलावात बुडून ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. ऋषींदर तुकाराम सरकाळे (३२) व अमोल सुदाम गोरे (३२) अशी मयतांची नावे आहेत. या दोन्ही घटना मंगळवारी घडल्या.मंगळवारी सकाळी पाणी भरुन ठेवण्यासाठी ऋषींदर सरकाळे हे शेतात गेले होते. उशिरापर्यंत घरी न आल्याने वडील तुकाराम सरकाळे यांनी शेतात जाऊन पाहिले असता, ऋषींदर हे विजेच्या तारेला चिकटलेले दिसले. ऋषींदर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मौजपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि. फुलचंद मेंगडे, पोलीस कॉन्स्टेबल एस. एस. श्रीवास्तव, एस. जे. धायडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.तसेच भोकरदन तालुक्यातील हिसोडा येथील अमोल सुदाम गोरे हा तरुण कोठाकोळी शिवारात म्हैस चारण्यासाठी गेला होता.दुपारी दोन वाजेच्या सुमारास म्हैस येथील तलावात पाणी पिण्यासाठी गेली. म्हैस खोल पाण्यात जाऊन फसल्याने अमोल गोरे तलावात उडी मारुन तिला वाचवण्यासाठी गेला होता. अमोल गाळात फसल्याने बडून मरण पावला.अन्य घटनेत राजूर एका महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी राजूर येथे घडली. ज्योती अण्णा साबळे (२३) असे मयत तरुणीचे नाव आहे.मयत तरूणीचे आई -वडील जानेफळ येथील शेतात काम करण्यासाठी गेले होते. तर दोघे भाऊ कामानिमित्त बाहेर होते. दुपारी पाच वाजेच्या सुमारास ज्योतीचा भाऊ सोनू हा घरी आला असता, त्याला बहिणीने फाशी घेतल्याचे दिसले.घटनेची माहिती मिळताच राजूर पोलीस चौकीचे सहायक फौजदार शंकर काटकर, संतोष वाढेकर, गणेश मान्टे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातSuicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारी