शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वेगवेगळ््या घटनांत तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 01:09 IST

विजेच्या तारेला चिकटून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रामनगर येथे घडली. तर दुसऱ्या घटनेत हिसोडा खुर्द येथे तलावात बुडून ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन / रामनगर/राजूर : विजेच्या तारेला चिकटून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रामनगर येथे घडली. तर दुसऱ्या घटनेत हिसोडा खुर्द येथे तलावात बुडून ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. ऋषींदर तुकाराम सरकाळे (३२) व अमोल सुदाम गोरे (३२) अशी मयतांची नावे आहेत. या दोन्ही घटना मंगळवारी घडल्या.मंगळवारी सकाळी पाणी भरुन ठेवण्यासाठी ऋषींदर सरकाळे हे शेतात गेले होते. उशिरापर्यंत घरी न आल्याने वडील तुकाराम सरकाळे यांनी शेतात जाऊन पाहिले असता, ऋषींदर हे विजेच्या तारेला चिकटलेले दिसले. ऋषींदर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मौजपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि. फुलचंद मेंगडे, पोलीस कॉन्स्टेबल एस. एस. श्रीवास्तव, एस. जे. धायडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.तसेच भोकरदन तालुक्यातील हिसोडा येथील अमोल सुदाम गोरे हा तरुण कोठाकोळी शिवारात म्हैस चारण्यासाठी गेला होता.दुपारी दोन वाजेच्या सुमारास म्हैस येथील तलावात पाणी पिण्यासाठी गेली. म्हैस खोल पाण्यात जाऊन फसल्याने अमोल गोरे तलावात उडी मारुन तिला वाचवण्यासाठी गेला होता. अमोल गाळात फसल्याने बडून मरण पावला.अन्य घटनेत राजूर एका महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी राजूर येथे घडली. ज्योती अण्णा साबळे (२३) असे मयत तरुणीचे नाव आहे.मयत तरूणीचे आई -वडील जानेफळ येथील शेतात काम करण्यासाठी गेले होते. तर दोघे भाऊ कामानिमित्त बाहेर होते. दुपारी पाच वाजेच्या सुमारास ज्योतीचा भाऊ सोनू हा घरी आला असता, त्याला बहिणीने फाशी घेतल्याचे दिसले.घटनेची माहिती मिळताच राजूर पोलीस चौकीचे सहायक फौजदार शंकर काटकर, संतोष वाढेकर, गणेश मान्टे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातSuicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारी