शहरं
Join us  
Trending Stories
1
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
2
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
3
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
4
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
5
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
6
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
7
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
8
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
9
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
10
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
11
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
12
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
13
Amravati: अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी अंत!
14
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
15
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
16
UPI Transaction Failed: UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
18
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
19
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
20
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
Daily Top 2Weekly Top 5

जालना शहरात १०० खाटांचे रूग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:21 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जालना शहरातील शासकीय रूग्णालयासमोरील इमारतीत १०० खाटांचे आयसीयू रूग्णालय होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. जिल्ह्यात मात्र अद्याप एकही रूग्ण आढळून आला नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जालना शहरातील शासकीय रूग्णालयासमोरील इमारतीत १०० खाटांचे आयसीयू रूग्णालय होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी दिली.जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशातही वाढत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा सहाशेच्यावर गेला. राज्यातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. असे असतानाही जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रूग्ण सापडला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासनातर्फे उपाययोजना केल्या जात आहे.जिल्ह्यात ९८८ गावे असून, ७७९ ग्रामपंचायती आहे. गावात बाहेरगावाहून आलेले नागरिक प्रशासनास माहिती देत नसल्याने १९३० आरोग्य सेविका, १४७० आशा वर्कर्समार्फेत गावांमधील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण केले जात आहे. जवळपास ५ लाख कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आतापर्यंत २ लाख ५० हजार ५१ कुटुंबांचे सर्वेक्षण झाले असून ८ हजार १४० लोक बाहेरगावाहून आल्याचे आढळून आले. तर १८०७ लोकांना ताप, खोकला व सर्दी असल्याचे दिसून आले. त्यांची आरोग्य केंद्रांमध्ये तपासणी करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी सांगितले.सर्दी, ताप, खोकला असलेल्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी २१७ पथकांची नियुक्ती करण्यात आली. हे पथक संशयितांच्या तपासणीबरोबरच जनजागृती करीत आहे. आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामीण भागात आतापर्यंत ७ लाख पॉम्पलेटचे वाटप करण्यात आले.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आरोग्य विभागातील रिक्तपदांमुळे इतर कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत आहे. जिल्ह्यात ४१ आरोग्य केंदे्र आहे. त्यात जवळपास २९ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यासह आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, इतर कर्मचा-यांची बहुतांश पदे रिक्त आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटाचा सामना करताना आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.दरम्यान, जिल्ह्यात ४० रुग्णवाहिकांपैकी १०८ च्या १४ रुग्णवाहिका आहे. १०८ रुग्णवाहिकेतून संशयितांना शासकीय रुग्णालयात आणण्यात येते. आरोग्य केंद्रावर प्रत्यक्ष भेटी दिल्या असता, सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी केंद्रात आढळून आल्याचे खतगावकर यांनी सांगितले.ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य विभागातर्फे हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला असून, १८ मार्चपासून या क्रमांकावर केवळ ५ कॉल आले आहेत.ग्रामीण भागात जनजागृतीकोरोना आजारावर अद्यापही औषध निघाले नाही. या आजारावर मात करण्यासाठी सॅनिटायझरने वेळोवेळी हात धूणे, बाहेर न निघणे हे उपाय आहेत. याबाबत ग्रामीण भागातील रूग्णांमध्ये जागृती व्हावी, यासाठी आरोग्य विभागाने जिल्हाभरात ७७ ठिकाणी होर्डिंग, ५००० बॅर्नर, ७ लाख पॉम्पलेट वाटप केले.आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचा-यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहे. त्यामुळे येणा-या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास खाजगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांनी नुकतीच खाजगी डॉक्टरांची बैठक घेतली असून, सर्व डॉक्टरांनी उपचार करण्यास होकार दिला आहे.१५३९ खाटांची व्यवस्था : परदेशातून आले ८८ नागरिकपरदेशातून जिल्ह्यात आतापर्यंत ८८ नागरिक आले. तपासणी करून त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले. दर दोन दिवसांनी त्यांची तपासणी केली जाते. परदेशातून आलेल्यांनी बाहेर फिरू नये, असे आवाहन करण्यात आले. विलगीकरण कक्षासाठी जिल्हाभरातील १५ शाळा व महाविद्यालयांसह वसतीगृहही ताब्यात घेण्यात आले. यामध्ये १५३९ खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयHealthआरोग्य