शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

साडेतीन कोटींचा टंचाई कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 21:00 IST

जालना तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई पाहता पंचायत समिती प्रशासनाने ३ कोटी ४४ लाख रूपयांचा टंचाई कृती आराखडा सादर केला

जालना : जानेवारी ते जून या कालावधीतील जालना तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई पाहता पंचायत समिती प्रशासनाने ३ कोटी ४४ लाख रूपयांचा टंचाई कृती आराखडा जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. यात नळ योजना विशेष दुरूस्तीचे ४४ प्रस्ताव प्रस्तावित करण्यात आले आहेत.गतवर्षी परतीचा पाऊस दमदार झाल्याने जालना तालुक्यातील बहुतांश प्रकल्पांमध्ये सध्या पाणीसाठे उपलब्ध आहेत. मात्र, मार्च-एप्रिल नंतर काही प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ही संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पंचायत समिती प्रशासनाने गावनिहाय पाहणी करून आढावा घेतला होता. या आढाव्यानंतर जानेवारी ते जून २०२० या कालावधीतील संभाव्य टंचाई पाहता ३ कोटी ४४ लाख २२ हजार रूपयांचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.यात १३८ गावे, १२ वाड्यांवर १५० नवीन विंधन विहिरी घेणे, ३७ गावे आणि ७ वाड्यांमधील ४४ नळ योजना विशेष दुरूस्ती करणे, ६ गावे आणि ४ वाड्यांमध्ये १० तात्पुरत्या पूरक योजना घेणे, १०० गावे व ४३ वाड्यांसाठी १४३ खासगी विहीर अधिग्रहण करणे, १६ गावे एका वाडीसाठी १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आदी उपाय प्रस्तावित करण्यात आले आहेत. या उपायांसाठी अंदाजित खर्च ३ कोटी ४४ लाख २२ हजार रूपये येणार आहे. शहरी भाग वगळता तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांश जलस्त्रोतात पाणीसाठा आहे. शिवाय हातपंप, गावातील कूपनलिकांनाही सध्या मुबलक पाणी आहे. पुढील मार्च-एप्रिलमध्ये निर्माण होणा-या संभाव्य पाणीटंचाईच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पंचायत समिती प्रशासनाने हा टंचाई आराखडा वरिष्ठ पातळीवर दाखल केला आहे.टँकरसाठी लागणार १ कोटीप्रस्तावित योजनांमध्ये नवीन विंधन विहिरींसाठी ७५ लाख रूपये, नळ योजना विशेष दुरूस्तीसाठी ८४.५० लाख रूपये, तात्पुरती पूरक योजना घेण्यासाठी २५.५० लाख रूपये, खाजगी विहीर अधिग्रहणासाठी ७७.३२ लाख रूपये, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी १ कोटी २ लाख रूपये असा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.टंचाई होऊ नये म्हणून दक्षतासंभाव्य पाणीटंचाई आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक दक्षता घेतली जाते. याचाच एक भाग म्हणून विविध प्रस्तावित योजनांचा साधारणत: सव्वा तीन कोटींचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.संजय कुलकर्णीगटविकास अधिकारी, जालना

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक