शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

शेतीपूरक ६५ उद्योग होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:28 AM

शेतातील उत्पादित मालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू व्हावेत, सहकाराला बळकटी मिळावी यासाठी शासनाने जालना जिल्ह्याला ११ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.

ठळक मुद्देशेतमालावर प्रक्रिया : शासनस्तरावरून ११ कोटीचा निधी

विजय मुंडे।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतातील उत्पादित मालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू व्हावेत, सहकाराला बळकटी मिळावी यासाठी शासनाने जालना जिल्ह्याला ११ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीद्वारे जिल्ह्यातील ६५ सहकारी संस्थांचे शेतीपूरक उद्योग सुरू होणार आहेत. शेतातील उत्पादित मालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू होणार असल्याने याचा शेतकऱ्यांनाही लाभ होणार आहे.खासगी उद्योग, व्यवसायांमुळे सहकार क्षेत्राला घरघर लागली आहे! याचा थेट परिणाम शेतकरी, शेतमजुरांवर झाला आहे. त्यात दुष्काळाचे सावट सतत निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी मोडली आहे. परिणामी हाताला काम मिळावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून ग्रामीण भागातील युवकांचा शहराकडे ओढा वाढला असून, गावे ओस पडू लागली आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी शेतीपूरक उद्योग गावा-गावात सुरू होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने शासनाने शेती उत्पादीत मालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू व्हावेत, यासाठी पावले टाकली आहेत. ग्रामीण भागातील सहकारी संस्थांनी उद्योग सुरू करावेत, सहकाराला बळकटी मिळावी यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत (एम.सी.डी.सी.) सहकारी संस्थांना उद्योगासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. जालना जिल्ह्यासाठी ११ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सहकारी संस्थांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. दाखल प्रस्तावांच्या छाननीनंतर हे प्रस्ताव महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाकडे पाठविण्यात आले होते. तेथून ६३ संस्थांच्या उद्योगांना मंजुरी मिळाली असून, उर्वरित दोन प्रस्तावांनाही लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. शेतीपूरक मालावर प्रक्रिया होणारे उद्योग ग्रामीण भागात सुरू झाल्यानंतर शेतकरी, शेतमजुरांनाही याचा मोठा लाभ होणार आहे.

टॅग्स :JalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्र