शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

"मग, मी तुमच्यापुढं कान धरले असते"; मनोज जरांगेंनी 'मराठा' नेत्यांनाही सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 11:58 IST

सरकारकडून दडपशाही सुरू असून गृहमंत्र्यांनी आंतरवालीतील मंडप काढून फेका, व्यासपीठ काढा, असे आदेश दिल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

जालना - आंदोलन करायचं, पण शांततेत असं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत आपण मागे हटणार नाही, असे म्हटले. सगेसोयरेची अंमलबजावणी करा, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीवर आपण ठाम आहोत. त्यासाठी, सध्या केवळ परीक्षा असल्याने ३ मार्चपर्यंतचं रास्तारोको आंदोलन रद्द केलं असून गावागावात साखळी उपोषण सुरू असल्याचं जरांगे यांनी म्हटलं. यावेळी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरुन मराठा नेते नाराज असल्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्टीकरण दिले. तसेच, मराठा नेत्यांनाही चांगलंच सुनावलं. 

''सरकारकडून दडपशाही सुरू असून गृहमंत्र्यांनी आंतरवालीतील मंडप काढून फेका, व्यासपीठ काढा, असे आदेश दिले आहेत. पण, आंतरवालीचा मंडप हा मराठ्यांच्या अस्मितेचा मंडप आहे, तो आंतरवालीचा मंडप नाही. त्यामुळे, मराठ्यांना घाबरण्याचं कारण नाही. त्याच मंडपाने मराठा समाज एक केलेला आहे, त्याच मंडपाने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलेलं आहे.'', असे मनोज जरांगे यांनी म्हटलं. तसेच, सरकारला, विशेष करुन गृहमंत्र्यांना सांगणं आहे की, असले चाळे बंद करा. मंडपाजवळ खून पडले नाहीत, कापाकापी सुरू नाही की तिथं दहशतवाद्यांची लेकरं नाहीत. तिथं शांततेत साखळी उपोषण सुरू आहे, तुम्ही दडपशाही बंद करा,'' असे आवाहनही जरांगे यांनी सरकारला केले आहे. यावेळी, बोलताना मराठा नेत्यांनाही त्यांनी सुनावलं आहे. 

आंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर सरकारकडून सुरू असलेली दडपशाही थांबवा, आणि सगेसोयरे याची अंमलबजावणी करा, अशा आशयाचे ईमेल सर्व मराठा बांधवांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना करावे, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे. करोडेंच्या संख्येने हे इमेल करा, असे जरांगे यांनी म्हटले. मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटणार नाही. मला अटक केली तरी माझं आमरण उपोषण सुरू होणार आहे, तुरुंगातच उपोषण करणार आहे, असेही जरांगे यांनी म्हटले. 

मी भांडलो कोणासाठी, तर मराठ्यांसाठी. त्यामध्ये, श्रीमंत मराठा असो, राजकारणी मराठा असो, नोकरदार वा व्यावसायिक असो, शेतकरी-कष्टकरी, गोरगरीब-लहानमोठ्या मराठ्यांसाठी मी भांडलो. मी बोललोय नेत्याला, पण राग आलाय मराठ्यांच्या नेत्याला, असे म्हणत मराठा समाजातील नेत्यांनाही जरागेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या नेत्याला का बोलला म्हणून मराठ्यांच्या नेत्याला राग आलाय. पण, तुला त्यानी जवळ का केलंय, तर गोरगरीब मराठ्यांनी तुला मतदान केलं, तू आमदार झाला, मंत्री झाला. म्हणून तुला त्यांनी जवळ केलंय. आज सगळ्या आमदारांची जबाबदारी आहे. तुम्ही जातीकडून बोलायला हवं होतं. तुम्ही तुमच्या नेत्याला विचारायला हवं की, अधिसूचना काढलीय ना, मग ती द्या. मग ते कसकाय येड्यावानी करतात ते बघू... असे म्हणत जरांगे यांनी मराठा नेत्यांनाच सुनावले. मग, मी देखील कानाला धरलं असतं, माझी चूक आहे म्हणून. ते गुन्हे मागे घेऊ म्हटले होते, ते मागे घ्या हे तुम्ही म्हणालया पाहिजे होतं. मग, मी तुमच्यापुढं कानं धरले असते. तुमच्या स्वार्थासाठी गोरगरीब मराठ्यांची पोरं मारायला निघालात का, असा सवालही जरांगे यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना केला आहे. 

दरम्यान, मी मरायला तयार आहे, पण हटायला तयार नाही. सर्व मराठ्यांनी आपली एकजूट कायम ठेवावी, असे म्हणत शांतपणे पाहा काय होतंय ते. साखळी उपोषण आणि आंदोलन सुरू राहू द्या, असेही जरांगे यांनी म्हटले.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील