वीजबिलावर तोडगा काढण्यासाठी दहा ग्रामपंचायतींनी घेतला ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:36 IST2021-02-17T04:36:39+5:302021-02-17T04:36:39+5:30
राणीउंचेगांव ३३ के.व्ही मधून तळेगांव, राठी अंतरवाली, चापडगांव, भुतेगांव, शिंदे वडगांव, राणीउंचेगांव, मानेपुरी, पानेगाव, दाई अंतरवाली, कृष्णनगर, गुरुपिंप्री, शेवगळ, ...

वीजबिलावर तोडगा काढण्यासाठी दहा ग्रामपंचायतींनी घेतला ठराव
राणीउंचेगांव ३३ के.व्ही मधून तळेगांव, राठी अंतरवाली, चापडगांव, भुतेगांव, शिंदे वडगांव, राणीउंचेगांव, मानेपुरी, पानेगाव, दाई अंतरवाली, कृष्णनगर, गुरुपिंप्री, शेवगळ, पानेवाडी, निपानी पिंपळगाव, रवना भुतेगांव, मुढेगांव आदी २४ गावच्या परिसरातील ३५०० कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. महावितरणने कृषी पंपाचा विजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम हाती आहे. त्यामुळे रब्बीतील गहू, हरभरा आदी पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. तर मोंसबी, द्राक्षे, डांळीब या फळबागा पाण्याअभावी धोक्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक बाजू लक्षात घेवून कृषी पंपाच्या वसुलीमध्ये तोडगा काढून भरणा करुन घ्यावा यासाठी राणीउंचेगांव, राठी अंतरवाली, तळेगांव, शेवगळ, मानेपुरी, चापडगांव, गाढेसावरगांव, या ग्रामपंचायतने ठरावानुसार मागणी केली आहे. ठरावाची प्रत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मेश्राम यांना देण्यात आली आहे. यावेळी राणीउंचेगांवचे सरपंच विठ्ठल खैरे, राठी अंतरवालीचे सरपंच नकुल कंक, भगवान लोंढे, उध्दव माने, उमाजी लोंढे, गजानन झांबरे, शिंदे, शिवाजी डवणे, भानुदास लोंढे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
वीजबिले भरावीत
शेतकऱ्यांनी थकीत वीजबिलातील अर्धी रक्कम भरली तर अर्धे बील शासकीय योजनेनुसार माफ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेवून थकीत वीज बिले भरावीत, असे आवाहन उपविभागीय अभियंता नागरे यांनी केले आहे.