शहरातील प्रमुख चार रस्त्यांसाठी दहा कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:32 IST2021-02-11T04:32:55+5:302021-02-11T04:32:55+5:30
शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था लक्षात घेऊन आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ...

शहरातील प्रमुख चार रस्त्यांसाठी दहा कोटींचा निधी
शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था लक्षात घेऊन आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून सतत पाठपुरावा केला. याचा परिणाम म्हणूनच शहरातील मुर्गी तलाव पोलीस चौकी ते बाबूराव काळे चौक (२ कोटी), शिवाजी महाराज पुतळा ते जिजामाता चौक (३ कोटी), यासह जुना जालना भागातील मंमादेवी मंदिर ते रेल्वेस्थानक या रस्त्यासाठी (३ कोटी ७५ लाख) आणि शिवाजी महाराज पुतळा ते गुरु बच्चन चौक (१ कोटी २५ लाख) असा निधी मंजूर झाला असून, त्यासंदर्भतील शासन निर्णय १० फेब्रुवारी रोजी काढण्यात आला आहे.
एकूणच हा निधी मिळाल्याने या रस्त्याचे भाग्य उजळणार असून, या चारही रस्त्यांची बिकट अवस्था झाली होती. मोठमोठे खड्डे पडल्याने अनेकांना या मार्गावरून जाताना अडचणी येत होत्या. त्या आता दूर होणार असून, हे रस्ते ट्रीमिक्सचे होणार आहेत.
चौकट
आणखी निधी आणणार
शहरातील रस्ते तसेच अन्य विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीनुसार लवकरच आणखी भरीव निधी मिळणार असल्याची माहिती आ. गोरंट्याल यांनी दिली. त्यातून वेगवेगळ्या भागातील रस्ते, सांडपाण्याच्या नाल्या, सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प मार्गी लागणार आहेत.