शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धुणी-भांडी करून मुलांना शिकविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 00:03 IST

पतीच्या निधनानंतर मुलांच्या पंखांना बळ देत पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जालना येथील सीताबाई राजू चांदोडे यांनी धुणं-भांडी केली. त्यांच्या कष्टामुळे मुलं उच्चशिक्षित झाली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पतीच्या निधनानंतर मुलांच्या पंखांना बळ देत पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जालना येथील सीताबाई राजू चांदोडे यांनी धुणं-भांडी केली. त्यांच्या कष्टामुळे मुलं उच्चशिक्षित झाली असून, त्यांनी मुकबधीर मुलीला शिक्षण देऊन तिचा विवाहही केला आहे.जुना जालना विभागातील अशोकनगर येथे सीताबाई राजू चांदोडे राहतात. सातवीपर्यंत शिकलेल्या सीताबाई २० वर्षांपूर्वी पती राजू चांदोडे यांच्यासोबत भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. थोरला मुलगा आनंद, मधला अजय आणि धाकटी मुलगी अंजली. त्यात अंजली ही मूकबधिर. कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे सीताबाई चांदोडे यांनी घराबाहेर पडून धुनी-भांडी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सन २०१० मध्ये त्यांचे पती राजू चांदोडे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने घराची संपूर्ण जबबदारी सीताबाई चांदोडे यांच्याकडे आली. त्यांनी आपल्या मुलांना बळ देण्याचा निर्धार केला.धुणं-भांडी करूनच त्यांनी मोठ्या मुलाला अभियांत्रिकीचे शिक्षण दिले. दुसऱ्या मुलाने शिक्षणानंतर घरीच शालेय बॅग विक्री आणि आॅन लाईन सेवेचा व्यवसाय सुरू केला. मूकबधीर अंजलीचा गतवर्षी विवाह झाला असून, ती सासरी नांदत आहे. सीताबाई चांदोडे या आजही धुनी-भांडी करून कुटुंबाला हातभार लावत असून, मुलं स्वत:च्या पायावर उभी राहिल्याचे समाधान सीताबाई चांदोडे यांच्या चेह-यावर दिसून येते.कष्टाला प्रामाणिकतेची जोड हवीपतीच्या निधनानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण असे अनेक प्रश्न होते. मात्र, प्रामाणिकपणे केलेल्या कष्टामुळे मुलांच्या पंखांमध्ये बळ भरता आले. महिलांनी आपल्या समोरील प्रश्न सोडवून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करावेत.-सीताबाई चांदोडे, जालना

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनFamilyपरिवारSocialसामाजिक