शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

हरणांसह वन्य प्राण्यांचा कोवळ्या पिकांवर ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:07 IST

मागील काही दिवसांपासून हरीण, वनगाय, डुक्कर, माकड या प्राण्यांनी ग्रामीण भागात हैदोस घालून कोवळ््या पिकांची नासधूस सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : परतूर तालुक्यातील आष्टीसह आसनगाव, को. हादगाव, धामणगाव, पांडेपोखरी, लिंगसा या भागात मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड झाली आहे. तसेच चांगला पाऊस झाल्याने सोयाबीन, मुगाची उगवण क्षमताही चांगली आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून हरीण, वनगाय, डुक्कर, माकड या प्राण्यांनी ग्रामीण भागात हैदोस घालून कोवळ््या पिकांची नासधूस सुरू केली आहे.हे वन्यप्राणी पिकांचे नुकसान करत असल्याने अनेक शेतकरी रात्रं- दिवस पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतात तळ ठोकून रहात आहेत. तर अनेक शेतात कपाशीचे पूर्ण प्लँट हरणाने खाऊन संपविले आहेत. मागील काही वर्षांपासून शेतकरी दुष्काळाच्या चक्रव्युहात अडकला आहे.यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी विविध बियाणांची पेरणी केली. त्यामुळे यंदा तरी चांगले पीक हाती येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु, आता वन्यप्राणी पिकांचे नुकसान करत असल्याने वनविभागाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतक-यांनी सांगितले.शेतक-यांनी वन्य प्राण्यांसाठी शेतामध्ये बुजगावणे लावले आहेत. मात्र, याचाही काही फायदा होत नसल्याचे शेतक-यांनी सांगितले.पारडगाव : हरणांनी केला पिकाचा नाशपारडगाव : घनसावंगी तालुक्यातील अंतरवाला बु., पागरा, शेवगा शिवारात हरणाच्या कळपाने हैदोस घातला आहे. यामुळे शेतकरी वैतागळे आहेत. या परिसरात यंदा प्रथमच पावसाने वेळेवर हजेरी लावली होती.यामुळे बळीराजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतू, आता उगवण झालेल्या कापूस, तूर, सोयाबीन या पिकांची नासधुस वन्य प्राण्यांकडून होत आहे. यामुळे शेतकरी हताश झाला आहे. या बाबत आसद कुरेशी म्हणाले, मी ११ कपाशीचे बॅग लावल्या होत्या.यावर अमाप खर्च केला होता. पण, आता उगवून आलेले कोंब हरणाच्या कळपाने नष्ट केले आहेत. विशाल खरात म्हणाले, वन्य प्राण्यांच्या भीतीने आंम्ही रात्रभर शेतामध्ये जागरण करतोत. तसेच वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने कुंपनावर अनुदान द्यावे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभागAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी